शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

देशभरात हवी गोहत्या बंदी, सरसंघचालकांची मागणी

By admin | Updated: April 9, 2017 18:17 IST

गोहत्येविरोधात देशभरात एक कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - गोहत्येविरोधात देशभरात एक कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. गोरक्षण झाले पाहिजे मात्र, त्यासाठी होणारा हिंसाचार चुकीचा असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.  
 
देशभरात गोहत्या थांबवणारा कायदा आम्हाला हवा आहे, कायद्याचं पालन करून गायींचं रक्षण करावं असं ते म्हणाले.  राजस्थानमधील अलवारमध्ये कथित गोसंरक्षकांकडून ५५ वर्षीय डेअरी व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर भाजप आणि संघावर देशभरातून टीकेची झोड उठवण्यात आली होती.याच पार्श्वभूमीवर गोसंरक्षण करताना कायदा पाळण्याची गरज व्यक्त केली. 
 
महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालकांनी गो-रक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसेचा विरोध केला. गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसेमुळे इतरांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले जात आहे. अनेक राज्यांमध्ये संघाची पार्श्वभूमी असलेले लोक सत्तेवर आहेत. त्याठिकाणी गो-रक्षणासाठी कायदे बनवण्यात आले आहेत. गो-रक्षणाचे काम हिंसेमुळे बदनाम होत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
 
 ईशान्य भारत आणि केरळसारख्या राज्यांमधील भाजपाचे नेते बीफ खाण्याचं समर्थन करत असल्याने भाजपा दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.