शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

ग्रामस्थांच्या गैरहजेरीमुळे प्रभाग सभा रद्द चौकशीची मागणी : विस्तार अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

By admin | Updated: March 24, 2015 23:35 IST

मांडवड : अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा व उदासीनतेमुळे जनतेसाठी असणार्‍या चांगल्या उपक्रमांची कशी वाट लावली जाते याचा अनुभव मंगळवारी (दि. २४) आयोजित करण्यात आलेल्या भालूर गटातील प्रभाग समितीच्या बैठकीच्या निमित्ताने जनतेस व लोकप्रतिनिधींना आला. एरव्ही अनेकवेळा अधिकारी नसल्याने ग्रामसभा, आमसभा, प्रभागसभा तहकूब करण्यात आल्याचे प्रकार अनेकवेळा घडल्याचे ऐकण्यास मिळतेे; परंतु मंगळवारी भालूर येथे प्रभाग सभेत अधिकारी हजर मात्र ग्रामस्थच गैरहजर राहिल्याने सभा तहकूब करावी लागल्याची घटना घडली.

मांडवड : अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा व उदासीनतेमुळे जनतेसाठी असणार्‍या चांगल्या उपक्रमांची कशी वाट लावली जाते याचा अनुभव मंगळवारी (दि. २४) आयोजित करण्यात आलेल्या भालूर गटातील प्रभाग समितीच्या बैठकीच्या निमित्ताने जनतेस व लोकप्रतिनिधींना आला. एरव्ही अनेकवेळा अधिकारी नसल्याने ग्रामसभा, आमसभा, प्रभागसभा तहकूब करण्यात आल्याचे प्रकार अनेकवेळा घडल्याचे ऐकण्यास मिळतेे; परंतु मंगळवारी भालूर येथे प्रभाग सभेत अधिकारी हजर मात्र ग्रामस्थच गैरहजर राहिल्याने सभा तहकूब करावी लागल्याची घटना घडली.नांदगाव तालुक्यातील भालूर जिल्हा परिषद गटाचे जि. प. सदस्य अशोक जाधव यांनी आपल्या गटाची प्रभाग समितीची सभा दि. २४ मार्च रोजी भालूर येथे आयोजित केलेली होती. त्यासाठी नियोजित सभेच्या अध्यक्षांसह तालुक्यातील सर्वच विभागाचे अधिकारी वेळेवर हजर झाले; मात्र या जिल्हा परिषद गटात एकूण ३६ महसूल गावांचा समावेश असतानाही या सभेसाठी केवळ दहाच नागरिक उपस्थित होते. तरीही अधिकार्‍यांनी सभा घेण्याचे ठरविले; परंतु भालूर येथील शिवसेनेचे शिवाजी ढगे व लक्ष्मीनगरचे बापुसाहेब जाधव यांनी सभेस पुरेसे नागरिक उपस्थित नसल्याचा सवाल करीत सदरची सभा तहकूब करण्याची मागणी केली.प्रभाग समितीची सभा आयोजित केलेली असल्याची माहिती गटातील नागरिकांना देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची जनजागृती झालेली नसल्याची बाब सभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून देत सभा रद्द करण्याची त्यांनी मागणी केली.सभेचे सचिव विस्तार अधिकारी ढवळे यांनी एकवेळी ग्रामसेवकांना सभेबाबत सुचित केल्याने कोणत्याही ग्रामसेवकांनी जनजागृती गावात करू शकले नाही हे निदर्शनास आले. या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभाग समितीच्या बैठकीचा फज्जा उडविण्यास केवळ विस्तार अधिकारी ढवळे हे जबाबदार असल्याने तीव्र संताप व्यक्त करून सभा तहकूब करण्यात आली. व तालुकास्तरावरून आलेला अधिकार्‍यांचा फौजफाट्यासह लोकप्रतिनिधींना ही आल्या पावली परत जाण्याची नामुष्की पत्करावी लागली. (वार्ताहर)----चौकटया विभागाचे विस्तार अधिकारी ढवळे यांच्या अकार्यक्षमेतमुळेच आजची प्रभाग समितीची सभा तहकूब करावी लागल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला असून, याची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येऊन आज तहकूब करण्यात आलेली सभा पुढील आठवड्यात संपूर्ण जणजागृती करून घेण्यात येईल. अशोक जाधव जिल्हा परिषद भालूर गट, अध्यक्ष प्रभाग समिती.