शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

दिल्लीचा कौल ‘आप’ला

By admin | Updated: February 8, 2015 02:57 IST

उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या चुरशीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शनिवारी राजधानीतील ६७.१४ टक्के मतदारांनी मतदान केले.

एक्झिट पोलचे भाकीत : विधानसभेसाठी ६७ टक्के मतदान, भाजपाची हवा गुलनवी दिल्ली : उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या चुरशीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शनिवारी राजधानीतील ६७.१४ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदानाचा कौल आम आदमी पार्टी (आप)च्या बाजूने गेल्याचे भाकीत विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी ‘एक्झिट पोल’ (मतदानोत्तर चाचणी)च्या आधारे वर्तविले. ७० सदस्यीय विधानसभेसाठी ‘आप’ला मिळणाऱ्या संभाव्य जागांच्या आकड्यात तफावत असली, तरी भाजपाला सत्ता मिळणार नाही आणि ‘आप’ला निर्विवाद बहुमत मिळेल, हेच सर्वच्या सर्व एक्झिट पोलमधून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपाची विजयी वाटचाल रोखण्याचे काम राजधानीतील मतदारांनी केल्याचे चित्र निकालापूर्वीच तयार झाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत करणाऱ्या एक्झिट पोलपैकी एका चाचणीत ‘आप’ला सर्वाधिक ५३ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. वृत्तवाहिन्यांनी शनिवारी दिवसभर दाखविलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजपा हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कुठल्याही चाचणीत काँग्रेसला पाचच्या वर जागा दाखविण्यात आलेल्या नाहीत.परिणामी निकालानंतर पराभवाचे खापर भाजपात कोणाच्या माथी फोडले जाणार, तसेच अपश्रेयाचा धनी ठरविण्यावरून भाजपात होणाऱ्या संभाव्य सुंदोपसुंदीबद्दलची उत्कंठा वाढली आहे.कडक बंदोबस्तात मतदान;१० फेब्रुवारीला निकालसकाळी ८ वाजता संथगतीने मतदानास प्रारंभ झाला होता. परंतु जसजसा सूर्य डोक्यावर येत गेला तसतसा मतदारांमधील उत्साह सुद्धा वाढताना दिसला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले.२०१३च्या निवडणुकीत सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते. २००८ सालच्या ५७.५८ टक्क्यांच्या तुलनेत ते ९ टक्के अधिक होते. या निवडणुकीत सरासरी ६७.१४ टक्के मतदान झाले.एक्झिट पोल काय म्हणतात?संस्थाआपभाजपाकाँग्रेसएबीपी-नेल्सन३९ (३७%)२८ (३२%)३ (१९%)झी टीव्ही-सीव्होटर३५ (४२%)३१ (४०%)३ (११%)इंडिया टुडे-सिसरो३८-४६ (४१%)१९-२७ (३७%)३-५ (१५%)न्यूज नेशन४१-४५ (४७%)२३-२७ (३९%)१-३ (११%)न्यूज२४-चाणक्य४८ (४३%)२२ (३७%)० (१३%)इंडिया न्यूज-एक्सिस५३ (सर्वाधिक)१७२...तर भाजपाचे स्वप्न अधुरेचमतदारांचा नूर लक्षात घेता दिल्ली विधानसभा काबीज करण्याचे भाजपाचे १७ वर्षांपासूनचे स्वप्न याखेपेसही अधुरेच राहण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास यावर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०१६ साली पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना बळ मिळणार आहे.एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत बैठक झाली. आम आदमी पार्टीला कौल दिसत असला तरी आम्हीच बाजी मारू असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी व्यक्त केला आहे.