शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करणार

By admin | Updated: February 14, 2015 23:38 IST

येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ग्वाही : व्हीआयपी संस्कृती संपविणारनवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली. जनसेवेसाठी २४ तास काम, व्हीआयपी संस्कृती संपविणे व दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.रामलीला मैदनावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच तेथे उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमांची एक यादीच सादर केली; सोबतच आपच्या कार्यकर्त्यांना अहंकारापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले, एखादे मोठे यश पदरी पडले की अहंकारही जागृत होण्याची शक्यता असते आणि मग सर्वकाही मातीमोल होते. त्यामुळे सर्व मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी याबाबत सतर्क राहून आपण अहंकारी तर झालो नाही ना, याचा सतत विचार केला पाहिजे. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांनी देशातील इतर राज्यात निवडणूक लढण्यावर केलेल्या विधानांचा उल्लेख केला आणि त्यांच्या या वक्तव्यांवरून अहंकार निर्माण होत असल्याचे निदर्शनास येते, असे मत मांडले. काँग्रेसला लोकांनी पराभूत केले, कारण ते अहकांरी झाले होते. भाजपाला गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. परंतु यावेळी लोकांनी त्यांना नाकारले. कारण अहकांर! म्हणूनच आम्हाला यापासून दूर राहायचे आहे, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांना सतर्क केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अण्णा आंदोलन आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा उल्लेखअण्णा आंदोलन आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा आपल्या भाषणात उल्लेख करून केजरीवाल म्हणाले, अण्णा आंदोलनादरम्यान भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा देण्यात आली होती. त्यावेळी खरंच लोकपाल विधेयक आल्यानंतरही भारत भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो काय? असा संशय मनात होता. परंतु गेल्या वेळी ४९ दिवसांचे आप सरकार स्थापन झाले तेव्हा भ्रष्टाचार संपला होता, हे आमचे कट्टर विरोधकही मानतात. यावेळीही तसेच होईल, असा विश्वास आहे.भ्रष्टाचार उघड करण्यासाठी स्टिंग आॅपरेशन करण्याचा सल्लाही त्यांनी दिल्लीकरांना दिला; तसेच भ्रष्टाचारविरोधी टेलिफोन लाईन सुरू करण्याचे आश्वासन दिले. जनलोकपाल विधेयक पारित करणे आवश्यक असून लवकरच त्या दिशेने वाटचाल सुरू करू, असे केजरीवाल यांनी सांगितले.भाजपने दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे आणि केंद्र दिलेले वचन निश्चित पाळेल, अशी खात्री दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.दिल्लीच्या विकासाचा ऊहापोह करताना भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या पराभूत उमेदवार किरण बेदी आणि काँग्रेस नेते अजय माकन यांचा विशेष नामोल्लेख करून ते म्हणाले, बेदी मला मोठ्या बहिणीसमान आहेत. त्यांचे आम्ही वेळोवेळी सहकार्य घेऊ. माकन यांना संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला लागणार आहे. एकाअर्थी विरोधकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कवी प्रदीप यांच्या ‘इन्सान से इन्सान का हो भाईचारा’ गीताने भाषणाचा समारोपदिल्लीतील चर्च आणि ईसाई समुदायाच्या संस्थांवरील हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि सर्व समुदायांनी बंधूभाव आणि सद्भावनेने राहण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे आपली ही भावना त्यांनी गाण्यातून व्यक्त केली. केजरीवाल यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप मानवता आणि बंधूभावाचा संदेश देणाऱ्या ‘पैगाम’ या चित्रपटाच्या गीताने केला. २०१३ च्या शपथविधीदरम्यानही त्यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि मन्ना डे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत गायले होते.‘इन्सान से इन्सान का हो भाईचारा, यहीं पैगाम हमारा, यहीं पैगाम हमारा’