शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

छत्रपतींची अवमानना करणारा आग्रा किल्ल्यातील शिलालेख हटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 16:46 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची अवमानना करणारा आग्रा किल्ल्यावर लावण्यात आलेला शिलालेख काढून टाकण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 24 - छत्रपती शिवाजी महाराजांची अवमानना करणारा आग्रा किल्ल्यावर लावण्यात आलेला शिलालेख काढून टाकण्यात आला आहे. वादग्रस्त शिलालेख काढून त्याठिकाणी योग्य माहिती देणारा शिलालेख लावण्यात आला आहे. राज्यपाल राम नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन योग्य शिलालेख लावला असल्याची खातरजमा करुन घेतली. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रांतीय अधिवेशनाचं उद्घाटन करण्यासाठी आग्रा येथे गेले असता राज्यपाल राम नाईक यांनी आग्रा किल्ल्याला भेट दिली. 
 
यावेळी बोलताना राम नाईक यांनी सांगितलं की, "जगभरातील पर्यटक जरी ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला येत असले, तरी मराठी माणसांना छत्रपतींच्या आग्रा भेटीच्या स्फुर्तिदायी इतिहासाला उजाळा देण्यासाठी आग्रा किल्ल्यालाही आवर्जून भेट द्यायची असते. अशाच एका भेटीत महाराष्ट्रातून आलेल्या एका पर्यटकाचे आक्षेपार्ह आणि बदनामीकारक शिलालेखाकडे लक्ष गेले. इतिहासाचा विपर्यास करुन सदर शिलालेखात आग्र्याचा उन्हाळा सहन न झाल्याने महाराज मूर्च्छा येऊन पडले आणि त्यावेळी त्यांनी दिवाण-ए-खासमधील खांब पकडला असा जावईशोध लावण्यात आला होता". 
"औरंगजेबाने केलेला उपमर्द सहन न होऊन छत्रपती शिवाजी महाराज कसे संतापाने याच दिवान-ए-खासमध्ये कडाडले होते याची शूरगाथा सर्वविदित असतानाही बदनामीकारक शिलालेख लावण्यात आला होता. आता तो शिलालेख काढून नव्याने शिलालेख लावण्यात आला असून त्याठिकाणी "दिवान-ए-खास मे शिवाजी औरंगजेब से मिलने सन 1966 मे आये थे" असं लिहिण्यात आलं आहे", अशी माहिती राम नाईक यांनी दिली. 
 
राम नाईक यांनी शिलालेख बदलल्याची खातरजमा केली, सोबतच किल्ल्यासमोरील छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाची जबाबदारी त्यांनी आग्रा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वविद्यालयाकडे सोपवली.