शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

छत्रपतींची अवमानना करणारा आग्रा किल्ल्यातील शिलालेख हटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 16:46 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची अवमानना करणारा आग्रा किल्ल्यावर लावण्यात आलेला शिलालेख काढून टाकण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 24 - छत्रपती शिवाजी महाराजांची अवमानना करणारा आग्रा किल्ल्यावर लावण्यात आलेला शिलालेख काढून टाकण्यात आला आहे. वादग्रस्त शिलालेख काढून त्याठिकाणी योग्य माहिती देणारा शिलालेख लावण्यात आला आहे. राज्यपाल राम नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन योग्य शिलालेख लावला असल्याची खातरजमा करुन घेतली. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रांतीय अधिवेशनाचं उद्घाटन करण्यासाठी आग्रा येथे गेले असता राज्यपाल राम नाईक यांनी आग्रा किल्ल्याला भेट दिली. 
 
यावेळी बोलताना राम नाईक यांनी सांगितलं की, "जगभरातील पर्यटक जरी ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला येत असले, तरी मराठी माणसांना छत्रपतींच्या आग्रा भेटीच्या स्फुर्तिदायी इतिहासाला उजाळा देण्यासाठी आग्रा किल्ल्यालाही आवर्जून भेट द्यायची असते. अशाच एका भेटीत महाराष्ट्रातून आलेल्या एका पर्यटकाचे आक्षेपार्ह आणि बदनामीकारक शिलालेखाकडे लक्ष गेले. इतिहासाचा विपर्यास करुन सदर शिलालेखात आग्र्याचा उन्हाळा सहन न झाल्याने महाराज मूर्च्छा येऊन पडले आणि त्यावेळी त्यांनी दिवाण-ए-खासमधील खांब पकडला असा जावईशोध लावण्यात आला होता". 
"औरंगजेबाने केलेला उपमर्द सहन न होऊन छत्रपती शिवाजी महाराज कसे संतापाने याच दिवान-ए-खासमध्ये कडाडले होते याची शूरगाथा सर्वविदित असतानाही बदनामीकारक शिलालेख लावण्यात आला होता. आता तो शिलालेख काढून नव्याने शिलालेख लावण्यात आला असून त्याठिकाणी "दिवान-ए-खास मे शिवाजी औरंगजेब से मिलने सन 1966 मे आये थे" असं लिहिण्यात आलं आहे", अशी माहिती राम नाईक यांनी दिली. 
 
राम नाईक यांनी शिलालेख बदलल्याची खातरजमा केली, सोबतच किल्ल्यासमोरील छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाची जबाबदारी त्यांनी आग्रा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वविद्यालयाकडे सोपवली.