शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा - काँग्रेसचे मोदींना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 16:37 IST

काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या नरेंद्र मोदींनी आरोपी मंत्र्यांना हटवावे व संसद चालवावी, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  'काँग्रेसच्या नेत्यांनी येत्या वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ' आधी आरोपी मंत्र्यांना हटवावे आणि संसद चालवावी' असे प्रत्युत्तर काँग्रेसतर्फे देण्यात आले आहे. संसदीय कामकाज सुरळीतपणे चालवण्याची जबाबदारी ही सरकारची असून त्यासाठी त्यांना आपल्या आरोपी मंत्र्यांना हटवावे लागेल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. दिल्ली-मेरठ या १४ पदरी द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरणासाठी गुरूवारी नोएडामध्ये आलेल्या मोदींनी काँग्रेसला खडे बोल सुनावले होते. गेल्या ६० वर्षांपासून देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात काँग्रेस नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा असे मोदी यांनी म्हटवे होते.
मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, ' स्वत:च्या अपयशाचे खापर दुस-यांच्या माथी फोडण्यात मोदीजी माहीर आहेत. पण संसदेत विरोधक गोंधळ का घालतात याबद्दल मोदींनी आत्ममंथन करावे आणि विविध प्रकरणात आरोप लावण्यात आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह , परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरूण जेटली या मंत्र्यांना आधी पदावरून हटवावे.'  संसद सुरळीतपणे चालवण्याचे काम सरकारचे असते आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते. पण मोदीजी तर सतत बोलत असतात, कोणाचेही ऐकत तर नाहीतच' अशा शब्दांत सूरजेवाला यांनी मोदींवर टीका केली. संसद ही मर्यादा आणि लोकशाहीच्या मूल्यांवर चालत असते आणि तेथे कोणाचाही अंकुश चालत नाही, असेही सूरजेवाला म्हणाले. 
 
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी ?
दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरण समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. लोकांनी संसदेमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी, वेगवेगळी मते मांडण्यासाठी आपल्याला निवडून दिले असून ते आपले काम आहे. ज्यांना देशातील जनतेने नाकारले, ते आता गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, संसदेचे कामकाज रोखतात. पण देशातील गरिबांच्या विकासासाठी संसदेचे कामकाज सुरळीतपणे झालेच पाहिजे. त्यामुळे विरोधकांनी येत्या नवीन वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याचा संकल्प करावा, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला.