शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी मंत्र्यांना हटवा आणि संसद चालवा - काँग्रेसचे मोदींना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 16:37 IST

काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या नरेंद्र मोदींनी आरोपी मंत्र्यांना हटवावे व संसद चालवावी, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  'काँग्रेसच्या नेत्यांनी येत्या वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा' असा टोला लगावणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ' आधी आरोपी मंत्र्यांना हटवावे आणि संसद चालवावी' असे प्रत्युत्तर काँग्रेसतर्फे देण्यात आले आहे. संसदीय कामकाज सुरळीतपणे चालवण्याची जबाबदारी ही सरकारची असून त्यासाठी त्यांना आपल्या आरोपी मंत्र्यांना हटवावे लागेल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. दिल्ली-मेरठ या १४ पदरी द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरणासाठी गुरूवारी नोएडामध्ये आलेल्या मोदींनी काँग्रेसला खडे बोल सुनावले होते. गेल्या ६० वर्षांपासून देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात काँग्रेस नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा असे मोदी यांनी म्हटवे होते.
मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले, ' स्वत:च्या अपयशाचे खापर दुस-यांच्या माथी फोडण्यात मोदीजी माहीर आहेत. पण संसदेत विरोधक गोंधळ का घालतात याबद्दल मोदींनी आत्ममंथन करावे आणि विविध प्रकरणात आरोप लावण्यात आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह , परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरूण जेटली या मंत्र्यांना आधी पदावरून हटवावे.'  संसद सुरळीतपणे चालवण्याचे काम सरकारचे असते आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते. पण मोदीजी तर सतत बोलत असतात, कोणाचेही ऐकत तर नाहीतच' अशा शब्दांत सूरजेवाला यांनी मोदींवर टीका केली. संसद ही मर्यादा आणि लोकशाहीच्या मूल्यांवर चालत असते आणि तेथे कोणाचाही अंकुश चालत नाही, असेही सूरजेवाला म्हणाले. 
 
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी ?
दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गाच्या कोनशिला अनावरण समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. लोकांनी संसदेमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी, वेगवेगळी मते मांडण्यासाठी आपल्याला निवडून दिले असून ते आपले काम आहे. ज्यांना देशातील जनतेने नाकारले, ते आता गोंधळ घालून संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, संसदेचे कामकाज रोखतात. पण देशातील गरिबांच्या विकासासाठी संसदेचे कामकाज सुरळीतपणे झालेच पाहिजे. त्यामुळे विरोधकांनी येत्या नवीन वर्षात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याचा संकल्प करावा, असा टोला त्यांनी काँग्रेसला हाणला.