शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांमुळे विमानांना उशीर; अहवाल मागितला

By admin | Updated: July 3, 2015 02:55 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याशी संबंधित असलेल्या विमान उड्डाणातील विलंबाच्या दोन ताज्या घटनांबाबत

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याशी संबंधित असलेल्या विमान उड्डाणातील विलंबाच्या दोन ताज्या घटनांबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाने एअर इंडियाकडे अहवाल मागितला आहे. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) विमानांच्या विलंबाबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाकडे अहवाल मागितला आहे. फडणवीस आणि रिजिजू यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानांना विलंब झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.‘आम्ही या दोन्ही घटनांवरील अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. एअर इंडियाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे आणि अहवाल मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल,’ असे नागरी उड्डयन सचिव आर.एन. चौबे म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानेही नागरी उड्डयन मंत्रालयाकडे विमानांच्या उशिरा उड्डाणाबद्दल अहवाल मागितला आहे. व्हीआयपी प्रवास करीत असल्याने एअर इंडियाच्या विमानांना उशीर झाल्याबद्दल पीएमओने नागरी उड्डयन मंत्रालयाकडे अहवाल मागितला आहे, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने टिष्ट्वटरवर दिली.गेल्या २९ जून रोजी फडणवीस यांना अमेरिकेला घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या मुंबई-नेवार्क विमानाला विलंब झाला होता. फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांनी सोबत वैध व्हिसा नसलेले पासपोर्ट आणल्याचे आयत्यावेळी लक्षात आल्याने विमान २० मिनिटे उशिराने आकाशात झेपावले होते. दुसरी घटना २४ जून रोजी रिजिजू यांना लेहहून दिल्लीला आणणाऱ्या विमानाबाबत घडली होती. रिजिजू, त्यांचा पीए आणि जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग या तिघांना एयर इंडियाच्या लेह-नवी दिल्ली विमानात जागा मिळावी यासाठी एका बालकासह तीन प्रवाशांना विमानात बसण्यास मनाई करण्यात आली होती आणि त्यामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता. (वृत्तसंस्था)रिजिजू यांचा माफीनामालेह ते दिल्ली या एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणास विलंब झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी माफी मागितली आहे. आपल्यामुळे अन्य प्रवाशांना विमानात बसण्यास मनाई करण्यात आल्याच्या घटनेबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

माफी मागणार नाही -उपमुख्यमंत्रीजम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी मात्र या प्रकरणी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. ‘मी पदाचा दुरुपयोग केलेला नाही,’ असे सांगून निर्मल सिंग यांनी उलट वैमानिकावरच गैरवर्तन केल्याचा आरोप लावला. राजू यांनीही मागितली माफीएअर इंडियाच्या विमानांचे उशिरा उड्डाण केल्याबद्दल आणि व्हीआयपींना जागा देण्यासाठी अन्य प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आल्याबद्दल नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी जाहीर क्षमायाचना केली आहे.‘विमानात व्हीआयपींना जागा मिळावी म्हणून काही प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आल्याबद्दल आणि त्यामुळे विमानाच्या उड्डाणात विलंब झाल्याने अन्य प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल नागरी उड्डयनमंत्री या नात्याने मी माफी मागतो. जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर असे का झाले याची आम्ही विचारणा करू आणि यापुढे असे घडणार नाही, याची काळजी घेऊ,’ असे राजू यांनी म्हटले आहे.