शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा मान्सून लांबणीवर

By admin | Updated: September 23, 2014 04:54 IST

मान्सूनचा परतीचा प्रवास सात दिवसांनी लांबला आहे. उत्तर भारतात मान्सून अधिक काळ सक्रिय राहिल्यामुळे हा बदल घडला आहे.

पणजी : मान्सूनचा परतीचा प्रवास सात दिवसांनी लांबला आहे. उत्तर भारतात मान्सून अधिक काळ सक्रिय राहिल्यामुळे हा बदल घडला आहे. गोव्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या महितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास २५ सप्टेंबरपर्यंत सुरू होतो. मुंबईत ही प्रक्रिया १० आॅक्टोबर, तर गोव्यात ११ किंवा १२ आॅक्टोबरला घडते. परंतु परतीच्या प्रवासाची सुरुवातच लांबल्यामुळे आता गोव्यात नियोजित वेळेस मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू होईल की, ७ दिवसांनी लांबेल, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. मान्सून परतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियोजित वेळेत मुंबई आणि गोव्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या गोवा विभागाच्या संचालक व्ही. के. मनी यांनी सांगितले.गोव्यात यंदा सरासरी ११८ इंच पाऊस झाला. गेल्या वर्षी २२ सप्टेंबरपर्यंत ११४ इंच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाचा पाऊस ४ इंच म्हणजेच ४ टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच एल निनोच्या प्रभावामुळे सुरवातीला दुष्काळसदृश्य स्थितीची भीती व्यक्त होत होती. हवामान विभागाने ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. मात्र एल निनोचा प्रभाव संपल्यानंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने गोव्यात पोकळी तर भरून काढलीच; शिवाय गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. (प्रतिनिधी)