शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

कमी वयात लग्न केल्याने घटते उंची - जितनराम मांझी

By admin | Updated: October 13, 2014 19:54 IST

कमी वयात लग्न झाल्यानेत आपल्याकडील लोकांची उंची घटली असे अजब तर्कशास्त्र मांझी यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १३ - बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. लग्नासाठी वयोमर्यादा २५ वर नेण्याची पाठराखण करताना कमी वयात लग्न झाल्याने आपल्याकडील लोकांची उंची घटली असे अजब तर्कशास्त्र मांझी यांनी मांडले आहे. 
पाटणा येथील जनता दरबारात मुख्यमंत्री जितनराम मांझी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. मांझी म्हणाले, आश्रम पद्धतीनुसार माणसाच्या जीवनात २५ वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, ५० पर्यंत गृहस्थ, ७५ पर्यंत वानप्रस्थ आणि त्यानंतर संन्यास असे चार टप्पे असतात. यानुसार लग्नासाठी वयोमर्यादा २५ पर्यंत वाढवायला हवी. आता माणसाची उंची सात फुटांवरुन पाच फुटांपर्यंत का घटली ? असा सवाल उपस्थित करत याचा संबंध त्यांनी कमी वयात होणा-या लग्नाशी जोडला. निरोगी आयुष्य व कुपोषणावर मात करण्यासाठी मुलगा - मुलगी या दोघांचीही वयोमर्यादा २५ पर्यंत न्यायला हवी असे त्यांनी नमूद केले. माझे लग्नही २५ व्या वर्षी झाले असल्याने सत्तरी गाठूनही मला अद्याप औषधं घ्यावी लागलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मांझी यांनी मांडलेल्या 'तर्कशास्त्रा'मुळे उपस्थितही अवाक झाले होते.