शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काम कमी, पण... डंकाच जास्त!

By admin | Updated: May 26, 2015 02:20 IST

ते ‘अच्छे दिन’ कुठे आहेत, असा थेट सवाल माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या सरकारची वर्षपूर्ती साजरी करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी केला.

चिदंबरम यांचा हल्लाबोल : ना रोजगार, ना उद्योगनवी दिल्ली : जे ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले होते, ते ‘अच्छे दिन’ कुठे आहेत, असा थेट सवाल माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या सरकारची वर्षपूर्ती साजरी करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी केला. रोजगार आणि विकासाबाबत मोठमोठ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या; पण आज ना रोजगार आहे, ना विकास. यालाच ‘अच्छे दिन’ म्हणायचे काय, असे चिदंबरम म्हणाले. तसेच जुन्याच योजनांच्या नव्याने पुड्या बांधून हे सरकार त्याचा डंका पिटत आहे, असाही त्यांनी आरोप केला. पंतप्रधान मोदी हे प्रचार करण्यात तरबेज आहेत. त्यांचे सरकार गोष्टीदेखील मोठ्यमोठ्या करते. त्यामागे या सरकारचा चांगला विचार असेल, असे गृहीत धरतो. परंतु हे सरकार लक्ष्य कसे गाठणार, ही माझी चिंता आहे. जी पावले उचलली पाहिजेत, ती वित्तमंत्री अरुण जेटली अजिबातच उचलताना दिसत नाहीत, अशा शब्दांत चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली. ते पुढे म्हणाले, की गुंतवणूकदार संभ्रमात असल्यामुळेही आम्ही चिंतित आहोत. काय करावे, हे गुंतवणूकदारांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे ‘क्रेडिट ग्रोथ’ थांबली आहे. मोदी सरकारला आपण दहापैकी किती गुण देणार, असे विचारले असता चिदंबरम म्हणाले, की जर तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलत असाल तर मी शून्य गुण देईन. प्रख्यात अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांनीही मोदी सरकारला शून्य गुण दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)गरम हवेचा फुगागरम हवा भरलेला फुगा फार काळ उडविता येणार नाही, अशी बोचरी टीकाही चिदंबरम यांनी मोदी सरकारवर केली. तसेच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून सरकारवर तोफ डागली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाली आहे. परंतु त्याचा लाभ सामान्य ग्राहकांना मिळवून दिला जात नाही. खनिज तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने ५० हजार कोटी रुपयांचा लाभ ग्राहकांना मिळायला हवा होता. परंतु मोदी सरकारने कर वाढवून हे ५० हजार कोटी रुपये वसूल केले आहेत, असा युक्तिवाद चिदंबरम यांनी या वेळी केला.ही कसली योजना ? कोळसा खाणींच्या लिलावावर भाषणे देण्यात आली; परंतु हेच मोदी सरकार आता कोळसा आयात करीत आहे. अखेर ही कसली योजना आहे? निर्यातीत प्रचंड घट झालेली आहे, जी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी घट आहे, असही चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारचे निर्णय योग्य आहेत की अयोग्य, हे येणारा काळच सांगेल. आम्ही सरासरी ८.५% विकासदर दिला होता. एवढा विकासदर कोणतेच सरकार देऊ शकलेले नाही. - पी. चिदंबरम