शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

काम कमी, पण... डंकाच जास्त!

By admin | Updated: May 26, 2015 02:20 IST

ते ‘अच्छे दिन’ कुठे आहेत, असा थेट सवाल माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या सरकारची वर्षपूर्ती साजरी करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी केला.

चिदंबरम यांचा हल्लाबोल : ना रोजगार, ना उद्योगनवी दिल्ली : जे ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले होते, ते ‘अच्छे दिन’ कुठे आहेत, असा थेट सवाल माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या सरकारची वर्षपूर्ती साजरी करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी केला. रोजगार आणि विकासाबाबत मोठमोठ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या; पण आज ना रोजगार आहे, ना विकास. यालाच ‘अच्छे दिन’ म्हणायचे काय, असे चिदंबरम म्हणाले. तसेच जुन्याच योजनांच्या नव्याने पुड्या बांधून हे सरकार त्याचा डंका पिटत आहे, असाही त्यांनी आरोप केला. पंतप्रधान मोदी हे प्रचार करण्यात तरबेज आहेत. त्यांचे सरकार गोष्टीदेखील मोठ्यमोठ्या करते. त्यामागे या सरकारचा चांगला विचार असेल, असे गृहीत धरतो. परंतु हे सरकार लक्ष्य कसे गाठणार, ही माझी चिंता आहे. जी पावले उचलली पाहिजेत, ती वित्तमंत्री अरुण जेटली अजिबातच उचलताना दिसत नाहीत, अशा शब्दांत चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली. ते पुढे म्हणाले, की गुंतवणूकदार संभ्रमात असल्यामुळेही आम्ही चिंतित आहोत. काय करावे, हे गुंतवणूकदारांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे ‘क्रेडिट ग्रोथ’ थांबली आहे. मोदी सरकारला आपण दहापैकी किती गुण देणार, असे विचारले असता चिदंबरम म्हणाले, की जर तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलत असाल तर मी शून्य गुण देईन. प्रख्यात अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांनीही मोदी सरकारला शून्य गुण दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)गरम हवेचा फुगागरम हवा भरलेला फुगा फार काळ उडविता येणार नाही, अशी बोचरी टीकाही चिदंबरम यांनी मोदी सरकारवर केली. तसेच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून सरकारवर तोफ डागली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाली आहे. परंतु त्याचा लाभ सामान्य ग्राहकांना मिळवून दिला जात नाही. खनिज तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने ५० हजार कोटी रुपयांचा लाभ ग्राहकांना मिळायला हवा होता. परंतु मोदी सरकारने कर वाढवून हे ५० हजार कोटी रुपये वसूल केले आहेत, असा युक्तिवाद चिदंबरम यांनी या वेळी केला.ही कसली योजना ? कोळसा खाणींच्या लिलावावर भाषणे देण्यात आली; परंतु हेच मोदी सरकार आता कोळसा आयात करीत आहे. अखेर ही कसली योजना आहे? निर्यातीत प्रचंड घट झालेली आहे, जी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी घट आहे, असही चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारचे निर्णय योग्य आहेत की अयोग्य, हे येणारा काळच सांगेल. आम्ही सरासरी ८.५% विकासदर दिला होता. एवढा विकासदर कोणतेच सरकार देऊ शकलेले नाही. - पी. चिदंबरम