शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट

By admin | Updated: July 19, 2014 02:23 IST

रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे.

नवी दिल्ली : रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. २०१०-११ मध्ये अशा अपघातांची संख्या ९३ होती ती २०११-१२ मध्ये ७७ तर २०१२-१३ मध्ये ६८ वर आली आहे. २०१३-१४ मध्ये मात्र त्यात किंचित वाढ होऊन ती ७१ झाली, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.गेल्या काही वर्षांत रेल्वेचे वारंवार अपघात झाल्याचे पाहता सुरक्षा अहवाल निष्प्रभ ठरले. छपरा येथे राजधानी एक्स्प्रेस घसरल्यानंतर गेल्या दोन वर्षांत किती अपघात झाले? रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय करण्यात आले, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. २०१२-१३ या वर्षी रेल्वे धडकण्याच्या ६ घटना घडल्या. याच श्रेणीतील अपघात २०१३-१४ या वर्षात ४ वर आले. यावर्षी ३० जूनपर्यंत केवळ एक घटना घडली आहे. २०१२-१३ मध्ये रेल्वे घसरल्यामुळे ४९ अपघात झाले. २०१३-१४ मध्ये अशा ५३ दुर्घटना झाल्या. यावर्षी जून ३० पर्यंत या दुर्घटनांची संख्या ३० आहे. गेटमन क्रॉसिंगवरील अपघात, रेल्वेतील आगीच्या घटना आणि अन्य किरकोळ दुर्घटनांची माहितीही त्यांनी दिली.२०१२-१३ या वर्षात अपघातांची संख्या १६ होती. त्याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी झाली. विभागीय समितीने अन्य ५२ अपघातांची चौकशी केली. २०१३-१४ या वर्षातील याच काळात अशा दोन्ही अपघातांची आकडेवारी ९ आणि ६२ होती. यावर्षी ३० जूनपर्यंत ही संख्या ४ आणि २२ एवढी होती. गेल्या दोन वर्षांत तसेच यावर्षी ३० जूनपर्यंत १६६ पैकी ११५ घटनांची चौकशी समितीने केली आहे. दोषी ३२६ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली. रेल्वेमध्ये आरपीएफ, जीआरपी तसेच जिल्हा पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा असते, असेही रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)