शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट

By admin | Updated: July 19, 2014 02:23 IST

रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे.

नवी दिल्ली : रेल्वे क्रॉसिंगवरील घटना वगळता अपघातांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. २०१०-११ मध्ये अशा अपघातांची संख्या ९३ होती ती २०११-१२ मध्ये ७७ तर २०१२-१३ मध्ये ६८ वर आली आहे. २०१३-१४ मध्ये मात्र त्यात किंचित वाढ होऊन ती ७१ झाली, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.गेल्या काही वर्षांत रेल्वेचे वारंवार अपघात झाल्याचे पाहता सुरक्षा अहवाल निष्प्रभ ठरले. छपरा येथे राजधानी एक्स्प्रेस घसरल्यानंतर गेल्या दोन वर्षांत किती अपघात झाले? रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय करण्यात आले, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. २०१२-१३ या वर्षी रेल्वे धडकण्याच्या ६ घटना घडल्या. याच श्रेणीतील अपघात २०१३-१४ या वर्षात ४ वर आले. यावर्षी ३० जूनपर्यंत केवळ एक घटना घडली आहे. २०१२-१३ मध्ये रेल्वे घसरल्यामुळे ४९ अपघात झाले. २०१३-१४ मध्ये अशा ५३ दुर्घटना झाल्या. यावर्षी जून ३० पर्यंत या दुर्घटनांची संख्या ३० आहे. गेटमन क्रॉसिंगवरील अपघात, रेल्वेतील आगीच्या घटना आणि अन्य किरकोळ दुर्घटनांची माहितीही त्यांनी दिली.२०१२-१३ या वर्षात अपघातांची संख्या १६ होती. त्याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी झाली. विभागीय समितीने अन्य ५२ अपघातांची चौकशी केली. २०१३-१४ या वर्षातील याच काळात अशा दोन्ही अपघातांची आकडेवारी ९ आणि ६२ होती. यावर्षी ३० जूनपर्यंत ही संख्या ४ आणि २२ एवढी होती. गेल्या दोन वर्षांत तसेच यावर्षी ३० जूनपर्यंत १६६ पैकी ११५ घटनांची चौकशी समितीने केली आहे. दोषी ३२६ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली. रेल्वेमध्ये आरपीएफ, जीआरपी तसेच जिल्हा पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा असते, असेही रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)