शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेमध्ये पंतप्रधानांच्या विरुद्ध घोषणा

By admin | Updated: May 10, 2016 03:24 IST

केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात इटलीचा संबंध कोणाशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, असे सांगत काँग्रेस नेत्यांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी

प्रमोद गवळी,नवी दिल्लीकेरळमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात इटलीचा संबंध कोणाशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, असे सांगत काँग्रेस नेत्यांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस सदस्यांनी सोमवारी राज्यसभेत केली. काँग्रेस सदस्यांनी या मागणीसाठी घोषणाबाजी केल्यामुळे कामकाजात सतत अडथळे येत राहिले.राज्यसभेत शून्य प्रहर सुरू होताच, काँग्रेसचे जयराम रमेश उभे राहिले. आपण अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी सादर केलेली कागदपत्रे राज्यसभेत स्वीकारली आहेत, या सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटचा उल्लेख करून ते म्हणाले की, वास्तविक स्वामी यांना खरे बोलण्याची सवय नाही. असे असताना त्यांनी सादर केलेली कागदपत्रे राज्यसभेने कशी स्वीकारली, असा प्रश्न रमेश यांनी केला. त्यावर उपसभापती पी. जे. कुरियन यांनी खुलासा केला की, स्वामी यांनी कागदपत्रे कार्यालयात केवळ जमा केली आहेत. मात्र ती स्वत: स्वामी यांनीही प्रमाणित केलेली नाहीत. त्यांच्या या खुलाशाचे काँग्रेस सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. नंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तपत्राचा हवाला देत आरोप केला की निवडणुकीच्या दरम्यान अगुस्ताच्या निमित्ताने काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सध्या भाजपातर्फे सुरू आहेत. वास्तविक, या विषयावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होत असून, त्यात कुठेही यूपीएच्या एकाही नेत्याचे नाव आलेले नाही. असे असताना जाहीर सभांमध्ये काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असून, ते सहन केले जाणार नाहीत. बोफोर्सप्रकरणीही असेच आरोप झाले. पण ते सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे अगुस्ता प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय तपास व्हावा, अशी आमची मागणी आहे. त्या वेळी अगुस्ताप्रकरणात लाच घेणाऱ्यांना आम्ही मोकळे सोडणार नाही, असे विधान संसदीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केले. पण इथे या विधानाचा संबंध नाही, असे सांगत काँग्रेस सदस्यांनी ‘प्रधानमंत्री झुठे है, नरेंद्र मोदी माफी मांगो’ अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १0 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियमांचे उल्लंघन केले असून, त्यांनी दोन्ही सभागृहांत याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केली. काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर खोटे बोलत असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी शर्मा यांनी केली. त्यावर तुम्ही हक्कभंगाची सूचना द्या, ती घेण्याबाबत विचार केला जाईल, असे उपसभापतींनी त्यांना सांगितले. त्यावर काँग्रेस सदस्यांनी पुन्हा मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या.