शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

उजनीतून 14 सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचा निर्णय

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

जिल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्य

जिल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्य
सोलापूर: सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीद्वारे 14 किंवा 15 सप्टेंबरला पाणी सोडले जाईल़ साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ सूक्ष्म नियोजन करुन मोहोळसाठी भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाल़े
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याबाबत मुंबईत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी बैठक बोलावली होती़ या बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ गणपतराव देशमुख, आ़ सुभाष देशमुख, आ़ दीपक साळुंखे, आ़ दिलीप सोपल, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, आ़ भारत भालके, आ़ बबनराव शिंदे, आ़ नारायण पाटील, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, ‘उजनी’चे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, ‘मनपा’चे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे आदी उपस्थित होत़े बर्‍याच दिवसांपासून विविध आमदारांकडून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला जात होता़
एनटीपीसीकडून उजनी ते आहेरवाडी अशी दुहेरी जलवाहिनी टाकण्यात येत आह़े ही योजना जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्यास याच जलवाहिनीद्वारे तूर्तास सोलापूरला पाणीपुरवठा करण्याचे देखील नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे म्हणाल़े सोलापूरला पाणी सोडल्यानंतर उजनी पाणीपातळी किती होईल, याचा सूक्ष्म विचार करुन नियोजन केले जात आह़े मोहोळसाठी पाणी सोडण्याबाबत देखील सकारात्मक विचार सुरू असून त्याचा निर्णय देखील दोन दिवसात घेतला जाईल, असे मुंढे म्हणाल़े नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर शहरावर येणारे जलसंकट तूर्तास तरी टळले आह़े महापालिकेने मात्र तातडीने समांतर जलवाहिनी करावी, 20 टीएमसी पाणी वाचल्यास शेतीसाठी हे पाणी वापरात येईल, असे मुंढे म्हणाल़े
चौकट़़़
मनपाने समांतर जलवाहिनी करावी
सोलापूर शहराला नदीतून वर्षातून चार पाळ्या सोडाव्या लागतात़ यासाठी सुमारे 20 टीएमसी पाणी वाया जात़े पाऊस न पडल्यास कदाचित नदीद्वारे सोलापूरला हे शेवटचे पाणी सोडणार आह़े महापालिकेने तातडीने उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी टाकावी़ समांतर जलवाहिनी न टाकल्यास यापुढे सध्या असलेल्या उजनी ते सोलापूर जलवाहिनीतून येणार्‍या 70 एमएलडी पाण्यावरच नियोजन कराव़े जलसंपदा मंत्री शिवतारे यांनी देखील जिल्हाधिकार्‍यांच्या या सूचना मनपाला बजावल्या आहेत़