शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

पाच राज्यांचा आज फैसला

By admin | Updated: May 19, 2016 05:42 IST

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज गुरुवारी होणार

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज गुरुवारी होणार असून निवडणूक आयोगाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. सुरक्षा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पाच राज्यांमध्ये झालेल्या या निवडणुका राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ममता बॅनर्जी, जयललिता, तरुण गोगोई, एम. करुणानिधी, ओमेन चंडी, व्ही.एस. अच्युतानंदन, बुद्धदेव भट्टाचार्य, सर्वानंद सोनोवाल, एन. रंगासामी आदी दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला या निकालाने होणार आहे.३ वाजेपर्यत सर्व निकालमतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होऊन दुपारी ३ वाजेपर्यत पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिली. मतमोजणी सुरू झाल्यावर तासाभरातच कल येणे सुरू होतील आणि १२ वाजेपर्यंत निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होईल. या निवडणुकीद्वारे ईशान्येकडील आसाममध्ये आपले सरकार स्थापन करण्याच्या भाजपाच्या दावेदारीवरही स्थिती स्पष्ट होईल. तामिळनाडूतही जयललिता यांच्या नेतृत्वातील अण्णाद्रमुकची सत्ता कायम राखण्यासाठीची कवायत आणि करुणानिधी यांच्या नेतृत्वातील द्रमुककडून मिळालेले आव्हान यात कोण वरचढ ठरणार हे कळेल. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आणि डाव्यांच्या एलडीएफमध्ये चुरस आहे. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी ८,३०० उमेदवार रिंगणात होते. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान पार पडले. राज्यात विधानसभेच्या २९४ जागा होत्या. तामिळनाडूत २३२ जागांसाठी ३७०० च्या वर उमेदवारांनी आपले राजकीय भविष्य अजमावले आहे. >पावसाचे सावटमतमोजणी होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मतमोजणीच्या कामातील आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बरीच अडचण होणार आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीनंतर जाहीर केलेल्या सर्वेक्षणात आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये परिवर्तनाची शक्यता वर्तविली आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र पुन्हा ममता बॅनर्जी यांचा पक्षच पुन्हा सत्तेवर येईल, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.