शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

चर्चा कुणाशी हे आधी ठरवा

By admin | Updated: November 6, 2014 03:15 IST

भारत सरकारची चर्चा करायची की भारत तोडू इच्छिणाऱ्या फुटीरवाद्यांशी ते आधी पाकिस्तानने ठरवावे आणि निर्णय घ्यायचा तो शहाणपणाने घ्यावा

नवी दिल्ली : भारत सरकारची चर्चा करायची की भारत तोडू इच्छिणाऱ्या फुटीरवाद्यांशी ते आधी पाकिस्तानने ठरवावे आणि निर्णय घ्यायचा तो शहाणपणाने घ्यावा, असा गर्भित इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिला आहे़आज बुधवारी ‘भारत आर्थिक शिखर’ बैठकीत जेटली बोलत होते़ गत आॅगस्टमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी फुटीरवाद्यांना चर्चेसाठी बोलवल्यानंतर भारताने पाकसोबतची परराष्ट्र सचिवस्तरावरील बैठक तडकाफडकी रद्द केली होती़ याच संदर्भाने बोलताना जेटली म्हणाले की, पाकिस्तानसोबत चर्चेस भारत तयार आहे़ भारत-पाक संबंध सामान्य व्हावेत, अशी आमची इच्छा आहे़ मात्र काही ‘लक्ष्मणरेषा’ आहेत़ आम्ही उभय देशात द्विपक्षीय चर्चेसाठी वातावरणनिर्मिती केली़ त्यानंतर परराष्ट्र सचिवस्तरावरील बैठक ठरली़ मात्र आमचे परराष्ट्र सचिव चर्चेसाठी पाकिस्तानला रवाना होणार त्याच्या काही तास आधी भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांनी फुटीरवाद्यांना चर्चेसाठी बोलविले़ तेव्हा भारत सरकारशी चर्चा करायची की फुटीरवाद्यांशी, चर्चा नेमकी कुणासोबत करायची याचा पाकने आवश्य विचार करावा़, असे ते म्हणाले. पाकिस्तान शहाणपणाने निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाकसोबत चर्चा अशक्य आहे, असेही जेटली यांनी स्पष्टपणे बजावले़(लोकमत न्यूज नेटवर्क)