शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

अंत्यसंस्कार झालेली युवती चार दिवसांनंतर परतली

By admin | Updated: May 26, 2017 01:00 IST

छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती युवती परतल्यामुळे सध्या चर्चा होत आहे.

महासमुंद (छत्तीसगढ) : छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती युवती परतल्यामुळे सध्या चर्चा होत आहे. तिच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या तिच्या कुटुंबियांना तिचे परतणे चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याचवेळी पोलिसांना आता हे शोधायचे आहे की, जिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले ती मुलगी कोण होती? अंत्यसंस्कारासोबत त्या दिवंगत मुलीशी संबंधित सगळे पुरावेच नष्ट झाले आहेत. ती युवती १७ एप्रिल रोजी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली होती. शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. हे प्रकरण आहे ते महासमुंद जिल्ह्यातील बागबाहरातील तेंदूलोथा गावातील. १९ मे रोजी भालुचुवां कंडीझरमध्ये अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. दुसऱ्या दिवशी तेंदूलोथातील एका कुटुंबाने ही युवती आमचीच असल्याची ओळख पटवून तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. २३ मे रोजी या कुटुंबाला आपली मुलगी जिवंत असल्याची माहिती समजली. रायपूर येथे वास्तव्यास असलेल्या मुलीच्या मामे भावाला मिळालेली ही माहिती कुटुंबियांनी पोलिसांना सांगितली. पोलिस त्या मुलीला मंगळवारी बागबाहरा ठाण्यात घेऊन आले. बागबाहराच्या टीआय शशिकला उइके यांनी सांगितले की, १९ मे रोजी भालुचुवा कंडीझरमध्ये सापडलेला अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह तेंदूलोथाच्या कुटुंबियांनी ती आमची मुलगी असल्याचे ओळखले होते. त्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीला रायपूरमध्ये ताब्यात घेण्यात आले. स्वत: तिनेच सांगितल्याप्रमाणे आई रागावल्यामुळे ती घर सोडून कांटाबाजी येथे गेली होती. तेथे १५ दिवस राहून रायपूरमध्ये दुकानात काम करू लागली होती. प्रसारमाध्यमांत तिने स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा ती तिच्या मावशीकडे होती.