शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कार झालेली युवती चार दिवसांनंतर परतली

By admin | Updated: May 26, 2017 01:00 IST

छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती युवती परतल्यामुळे सध्या चर्चा होत आहे.

महासमुंद (छत्तीसगढ) : छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती युवती परतल्यामुळे सध्या चर्चा होत आहे. तिच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या तिच्या कुटुंबियांना तिचे परतणे चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याचवेळी पोलिसांना आता हे शोधायचे आहे की, जिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले ती मुलगी कोण होती? अंत्यसंस्कारासोबत त्या दिवंगत मुलीशी संबंधित सगळे पुरावेच नष्ट झाले आहेत. ती युवती १७ एप्रिल रोजी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली होती. शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. हे प्रकरण आहे ते महासमुंद जिल्ह्यातील बागबाहरातील तेंदूलोथा गावातील. १९ मे रोजी भालुचुवां कंडीझरमध्ये अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. दुसऱ्या दिवशी तेंदूलोथातील एका कुटुंबाने ही युवती आमचीच असल्याची ओळख पटवून तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. २३ मे रोजी या कुटुंबाला आपली मुलगी जिवंत असल्याची माहिती समजली. रायपूर येथे वास्तव्यास असलेल्या मुलीच्या मामे भावाला मिळालेली ही माहिती कुटुंबियांनी पोलिसांना सांगितली. पोलिस त्या मुलीला मंगळवारी बागबाहरा ठाण्यात घेऊन आले. बागबाहराच्या टीआय शशिकला उइके यांनी सांगितले की, १९ मे रोजी भालुचुवा कंडीझरमध्ये सापडलेला अज्ञात युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह तेंदूलोथाच्या कुटुंबियांनी ती आमची मुलगी असल्याचे ओळखले होते. त्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीला रायपूरमध्ये ताब्यात घेण्यात आले. स्वत: तिनेच सांगितल्याप्रमाणे आई रागावल्यामुळे ती घर सोडून कांटाबाजी येथे गेली होती. तेथे १५ दिवस राहून रायपूरमध्ये दुकानात काम करू लागली होती. प्रसारमाध्यमांत तिने स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा ती तिच्या मावशीकडे होती.