शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी कर्जमाफीची आवश्यकता

By admin | Updated: February 1, 2017 01:19 IST

सरकारी बँकांची बुडित कर्जे व बड्या उद्योगांचा वाढता कर्जबाजारीपणा यातून लवकर मार्ग काढला नाही तर देशाच्या विकासाच्या गाड्यास खीळ बसू शकेल, असे प्रतिपादन

नवी दिल्ली : सरकारी बँकांची बुडित कर्जे व बड्या उद्योगांचा वाढता कर्जबाजारीपणा यातून लवकर मार्ग काढला नाही तर देशाच्या विकासाच्या गाड्यास खीळ बसू शकेल, असे प्रतिपादन करत आर्थिक सर्वेक्षण आहे. अहवालात बुडित कर्जे माफ करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.गेली काही वर्षे खासगी ‘अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या’ सुरु करून यातून मार्ग काढण्याचा झालेला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्यामुळे केंदाचे पाठबळ असलेली ‘ पब्लिक अ‍ॅसेट रिहॅबिलिटेशन एजन्सी’ (पीएआरए) संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव या सर्वेक्षणात आहे. बुडित कर्जांची मोठी व राजकीयदृष्ट्या प्रकरणे या संस्थेने हाताळावीत, असे सरकारला वाटते.सर्वेक्षण म्हणते की, बुडित कर्जे सरळसरळ माफ करून टाकली तर वशिलेबाजीचे आरोप होतील. कर्जे थकलेल्या कंपन्या सरकारने ताब्यात घेऊन त्या विकायला काढल्यास सरकार कठोरपणे वागत असल्याचे दूषण दिले जाईल.ज्यांच्याकडे सर्वाधिक कर्जे थकलेली आहेत अशा १०० खासगी उद्योगांपैकी ५७ टक्के कर्जदारांचा कर्जबाजारीपणा ७५ टक्क्यांहून अधिक कमी करावा लागेल. एकूण थकित कर्जांपैकी ४० टक्के कर्जे ज्यांनी दिली आहेत, अशा किमान १३ सरकारी बँकांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यांची २० टक्क्यांहून अधिक कर्जे वसूल न होण्याच्या स्थितीत आहेत. यातून यशस्वीपणे मार्ग काढण्याची गरज असल्याचे सरकार म्हणते.सद्यस्थिती देशाच्या आर्थिक सुदृढतेसाठी पोषक नाही. बुडित कर्जांतून बाहेर न पडल्यास आर्थिक विकासावर दुष्परिणाम होणे अपरिहार्य आहे. कर्जांचा मोठा बोजा असलेल्या कंपन्या नवी गुंतवणूक करताना हात आखडता घेत आहेत. ज्यांची कर्जे थकली आहेत त्या बँका नवी कर्जे देण्याचा धोका पत्करायला तयार नाहीत. सात वर्षांत खासगी क्षेत्राची भांडवली गुंतवणूक कमी होत गेली आहे व सरकारी गुंतवणुकीतही वाढ झालेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोजके बडे थकीत कर्जदारआर्थिक सर्वेक्षणानुसार बँकांच्या एकूण थकीत कर्जांपैकी ७१ टक्के कर्जे ५० कंपन्यांकडे थकली आहेत. यापैकी १० कंपन्यांची थकीत कर्जे ४० हजार कोटी रुपयांची आहेत. त्यामुळे ज्या कंपन्यांचे उत्पन्न व्याज चुकते करता येईल, एवढेही नाही, अशा कंपन्यांच्या कर्जांपैकी मोठा भाग माफ करावा लागेल, पण तपासी यंत्रणा फौजदारी कारवाई करतील, या भीतीने बँका हा निर्णय घ्यायला धजावत नाहीत.