शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

विकासासाठी कर्जमाफीची आवश्यकता

By admin | Updated: February 1, 2017 01:19 IST

सरकारी बँकांची बुडित कर्जे व बड्या उद्योगांचा वाढता कर्जबाजारीपणा यातून लवकर मार्ग काढला नाही तर देशाच्या विकासाच्या गाड्यास खीळ बसू शकेल, असे प्रतिपादन

नवी दिल्ली : सरकारी बँकांची बुडित कर्जे व बड्या उद्योगांचा वाढता कर्जबाजारीपणा यातून लवकर मार्ग काढला नाही तर देशाच्या विकासाच्या गाड्यास खीळ बसू शकेल, असे प्रतिपादन करत आर्थिक सर्वेक्षण आहे. अहवालात बुडित कर्जे माफ करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.गेली काही वर्षे खासगी ‘अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या’ सुरु करून यातून मार्ग काढण्याचा झालेला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्यामुळे केंदाचे पाठबळ असलेली ‘ पब्लिक अ‍ॅसेट रिहॅबिलिटेशन एजन्सी’ (पीएआरए) संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव या सर्वेक्षणात आहे. बुडित कर्जांची मोठी व राजकीयदृष्ट्या प्रकरणे या संस्थेने हाताळावीत, असे सरकारला वाटते.सर्वेक्षण म्हणते की, बुडित कर्जे सरळसरळ माफ करून टाकली तर वशिलेबाजीचे आरोप होतील. कर्जे थकलेल्या कंपन्या सरकारने ताब्यात घेऊन त्या विकायला काढल्यास सरकार कठोरपणे वागत असल्याचे दूषण दिले जाईल.ज्यांच्याकडे सर्वाधिक कर्जे थकलेली आहेत अशा १०० खासगी उद्योगांपैकी ५७ टक्के कर्जदारांचा कर्जबाजारीपणा ७५ टक्क्यांहून अधिक कमी करावा लागेल. एकूण थकित कर्जांपैकी ४० टक्के कर्जे ज्यांनी दिली आहेत, अशा किमान १३ सरकारी बँकांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यांची २० टक्क्यांहून अधिक कर्जे वसूल न होण्याच्या स्थितीत आहेत. यातून यशस्वीपणे मार्ग काढण्याची गरज असल्याचे सरकार म्हणते.सद्यस्थिती देशाच्या आर्थिक सुदृढतेसाठी पोषक नाही. बुडित कर्जांतून बाहेर न पडल्यास आर्थिक विकासावर दुष्परिणाम होणे अपरिहार्य आहे. कर्जांचा मोठा बोजा असलेल्या कंपन्या नवी गुंतवणूक करताना हात आखडता घेत आहेत. ज्यांची कर्जे थकली आहेत त्या बँका नवी कर्जे देण्याचा धोका पत्करायला तयार नाहीत. सात वर्षांत खासगी क्षेत्राची भांडवली गुंतवणूक कमी होत गेली आहे व सरकारी गुंतवणुकीतही वाढ झालेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोजके बडे थकीत कर्जदारआर्थिक सर्वेक्षणानुसार बँकांच्या एकूण थकीत कर्जांपैकी ७१ टक्के कर्जे ५० कंपन्यांकडे थकली आहेत. यापैकी १० कंपन्यांची थकीत कर्जे ४० हजार कोटी रुपयांची आहेत. त्यामुळे ज्या कंपन्यांचे उत्पन्न व्याज चुकते करता येईल, एवढेही नाही, अशा कंपन्यांच्या कर्जांपैकी मोठा भाग माफ करावा लागेल, पण तपासी यंत्रणा फौजदारी कारवाई करतील, या भीतीने बँका हा निर्णय घ्यायला धजावत नाहीत.