शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
4
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
5
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
7
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
8
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
9
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
10
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
11
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
13
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
14
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
15
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
16
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
17
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
18
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
19
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
20
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज नवे-जुन्याचे कागदी घोडे नाचवू नका पुनर्गठन न करणार्‍या बँकांवर कारवाई : जिल्हाधिकार्‍यांनी पीक पुनर्गठनावरून जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना सुनावले

By admin | Updated: April 26, 2016 23:11 IST

जळगाव : कर्जाचे पुनर्गठन केल्यास शेतकर्‍यांवर व्याजाचा अधिक भार पडत असतो. त्यामुळे शेतकरी पुनर्गठनापेक्षा जुने कर्ज नवीन करण्यावर भर देत असल्याचा जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांनी केलेला युक्तीवाद खोडून काढत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कागदी घोडे नाचविणे बंद करून शेतकर्‍यांच्या जास्तीत जास्त कर्जाचे पुनर्गठन करावे असे आदेश जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखाव्यवस्थापकांच्या बैठकीत दिले.

जळगाव : कर्जाचे पुनर्गठन केल्यास शेतकर्‍यांवर व्याजाचा अधिक भार पडत असतो. त्यामुळे शेतकरी पुनर्गठनापेक्षा जुने कर्ज नवीन करण्यावर भर देत असल्याचा जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांनी केलेला युक्तीवाद खोडून काढत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कागदी घोडे नाचविणे बंद करून शेतकर्‍यांच्या जास्तीत जास्त कर्जाचे पुनर्गठन करावे असे आदेश जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखाव्यवस्थापकांच्या बैठकीत दिले.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या बैठकीस व्यासपीठावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, लीड बँकेचे प्रबंधक दिलीप ठाकूर, सेेंट्रल बँकेचे प्रमुख एल.एन.टाकसांडे, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करा
यावर्षी दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप ही तत्काळ करणे गरजेचे आहे. यावर्षी २६०६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. आतापर्यंत सुमारे ३५० कोटींचे कर्जवाटप झाली आहे. १५ मे पर्यंत ५० टक्के पीक कर्जवाटप आणि ३० मे पर्यंत १०० टक्के पीक कर्जवाटप होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करावे अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केली.
बँकांनी केवळ नफा न कमविता सामाजिक बांधिलकी जपावी
राष्ट्रीयकृत बँका या कारसाठी कर्ज, गृह कर्ज, व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज देत असतात. बँकांनी नुसता नफा कमविणे हे ध्येय ठेवू नये तर शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप करून सामाजिक बांधिलकीदेखील जपणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. २७ तारखेपर्यंत पुनर्गठनासाठी मुदत असल्याने शेतकर्‍यांचे समुपदेशन करून त्यांना जास्तीत जास्त पुनर्गनाचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुनर्गठनाबाबत चुकीची माहिती पसरवू नका
जिल्हा बँकेच्या काही शाखाव्यवस्थापकांनी शेतकरी हा पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी तयार नसल्याचे सांगितले. पुनर्गठन केल्यानंतर शेतकर्‍याला १२ टक्के व्याज भरावे लागत असल्याने तो यासाठी नाखुश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी पुनर्गठनाबाबत चुकीची माहिती पसरवू नका असे बजावले. पहिल्या वर्षी शेतकर्‍याला कर्जावर व्याजाची आकारणी होत नाही. त्यानंतर दुसर्‍या वर्षी पुनर्गठनावर १२ टक्के व्याजाची आकारणी केली जात असताना त्यातील सहा टक्के हे शासन भरत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.