शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

(फोटो)

(फोटो)
कर्जबाजारी शेतक ऱ्याची आत्महत्या
धामणगाव येथील घटना : विहिरीत घेतली उडी
भिवापूर : सततची नापिकी, अतिवृष्टीचा फटका आणि वाढते कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना भिवापूर तालुक्यातील धामणगाव (विद्यामंदिर) येथे बुधवारी मध्यरात्री घडली असून, गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
मोहन वासुदेव राऊत (४२, रा. धामणगाव-विद्यामंदिर, ता. भिवापूर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. वासुदेव राऊत यांच्याकडे ४.१२ हेक्टर शेती आहे. त्यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टाका शाखेकडून एक लाख पाच हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. ते २००९ पासून थकीत आहे. शिवाय, त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथे घरातील सोन्याचांदीचे दागिने गहाण ठेवून पैशाची उचल केली होती. तसेच काही मित्र आणि नातेवाईकांकडूनही त्यांनी ५० हजार रुपये उसणे घेतले होते. गेल्या दोन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे त्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य झाले नाही. शिवाय, थकीत कर्जामुळे नो ड्यू सर्टिफिकेट न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या बँकांनी कर्जपुरवठा केला नाही. त्यातच त्यांनी यावर्षी उसणवारी करून पैसा गोळा केला आणि पेरणी केली.
आधी पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. दुबार पेरणी केल्यानंतर सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव झाला. त्यातच १३ व २२ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे यांची शेती पिकासह खरडून गेली. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी व प्रपंच चालविण्यासाठी पैसे आणायचे कुुठून, याच विचारात ते गेल्या काही दिवसांपासून होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. याच विचारात असताना त्यांनी बुधवारी मध्यरात्री शेतातील विहिरीत उडी घेतली. त्यांच्यापश्चात पत्नी कल्पना व पायल (१५), प्राजक्ता (१३), सुहानी (११) या तीन मुली आहेत. (तालुका प्रतिनिधी)
------
---चौकट---
तालुक्यातील दुसरी घटना
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची ही भिवापूर तालुक्यातील दुसरी घटना होय. तालुक्यातील सरांडी येथील संजय रामचंद्र राऊत (२५) या तरुण शेतक ऱ्याने १६ ऑगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तालुक्यातील या शेतकरी आत्महत्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
***