शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

तीन अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Updated: July 13, 2017 00:20 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवला

सुरेश डुग्गर । लोकमत न्यूज नेटवर्कश्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दिनचे तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांपैकी एका अतिरेक्याचा पोलीस अधिकारी आयुब पंडित यांच्या हत्येत समावेश होता. या घटनेनंतर बडगाममध्ये स्थानिक लोकांनी काश्मीरला स्वातंत्र्य हवे, अशा घोषणा दिल्या. बडगामच्या रुदवोडा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे मंगळवारी संध्याकाळपासून सुरक्ष दलांनी नाकेबंदी केली होती. अतिरेक्यांना पळून जाता येऊ नये, अशी व्यवस्थाच करण्यात आली होती. प्रत्येक घरात शिरून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना, अचानक सुरक्षा दलांवर गोळीबार झाला. पण अंधारामुळे ते कुठे लपले आहेत, याचा अंदाज घेता आला नाही. रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्यासाठी ते अधूनमधून सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळीबार करीतच होते. सकाळी पुन्हा दहशतवाद्यांचा बाहेर पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नात त्यांनी पुन्हा गोळीबार करताच, ते नेमके कुठे लपले आहेत, हे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षा दलांनीही गोळीबार करून, त्या तिघांचा खातमा केला. ते जिथे लपले होते, तिथे काही शस्त्रे आणि दारूगोळाही सापडला. ते तिघे हिजबुल मुजाहिद्दिनचे असून, मूळचे काश्मीरमधीलच आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)> निर्बंध जारीत्यातील साजिद गिरकर ठार झाल्याचे कळताच, बडगाम जिल्ह्याच्या मलरट्टा भागात तणाव निर्माण झाला. तिथे हिंसाचार होईल, अशी परिस्थिती होती. तो तेथील रहिवासी असल्याने बडगामच्या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत. त्याचा मृतदेह नंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याची दुपारी अंत्ययात्रा निघाली, त्यात हजारो लोक सहभागी झाले होते आणि ते काश्मीरला आझादी (स्वातंत्र्य) मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत होते. इतर दोघांचे मृतदेहही कुटुंबीयांकडे सोपविण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.