शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच

By admin | Updated: May 6, 2017 04:42 IST

संपूर्ण देशवासीयांमध्ये संताप निर्माण करणाऱ्या निर्भयावरील सामूहिक बलात्कार आणि तिची क्रूरपणे हत्या झाल्याच्या प्रकरणी चारही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संपूर्ण देशवासीयांमध्ये संताप निर्माण करणाऱ्या निर्भयावरील सामूहिक बलात्कार आणि तिची क्रूरपणे हत्या झाल्याच्या प्रकरणी चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. निकालानंतर निर्भयाच्या आईने अखेर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली, तर तिच्या वडिलांनी ‘चौघा क्रूरकर्म्यांना फासावर चढविल्यानंतरच खरा न्याय मिळेल,’ असे सांगितले. न्यायालयाच्या निकालाचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे. १६ डिसेंबर, २०१२ च्या रात्री ही दुर्दैवी आणि अत्यंत लज्जीत करणारी घटना घडली होती. शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले की, या घटनेने संपूर्ण देशभर संतापाची त्सुनामी निर्माण झाली व तो बलात्कार आणि हत्या ही अत्यंत क्रूर व दुर्मीळातील दुर्मीळ घटना होती. जिल्हा न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. हा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानेही योग्य ठरवले. या चार निर्दयी आरोपींना शिक्षामुकेश सिंह (२९), पवन गुप्ता (२२), विनय शर्मा (२३) आणि अक्षयकुमार सिंह या दोषींना फाशी दिली जाईल. या खटल्यातील आणखी एक आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर आणखी एक अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात तीन वर्षे ठेवण्याची शिक्षा सुनावली गेली होती. टाळ््या वाजवून स्वागत : सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी निकाल देताच कोर्टात उपस्थित असलेली निर्भयाची आई आशा देवी यांनी टाळ््या वाजवून निकालाचे स्वागत केले.आज तुला न्याय मिळणार...दुपारी जवळपास १ वाजून १५ मिनिटांनी निर्भयाचे आईवडील कोर्टातील मागील आसनावर येऊन बसले. शुक्रवारी प्रकरणाचा निकाल लागणार असल्याची माहिती निर्भयाच्या आईला गुरुवारी मिळाली. त्यामुळे गुरुवारी रात्रभर त्या झोपूही शकल्या नाहीत. सकाळी मुलीच्या फोटोकडे पाहून त्या निर्भयाला म्हणाल्या, "आज तुला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळणार."ती असती तर...जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली, तेव्हा निर्भया २३ वर्षांची होती. आज ती हयात असती, तर तिचे मेडिकल क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाले असते किंवा कदाचित तिचे लग्नदेखील झाले असते, असे सांगताना निर्भयाची आई भावुक झाली. निकालाने मी  आनंदी, देशही आनंदी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना कठोरपणे प्रतिबंध करणारा हा निकाल आहे, असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. न्यायालयाचा असा निकाल समाजात, असे गुन्हे करणाऱ्यांना व भविष्यातील अपराध्यांपर्यंत (विशेषत: अल्पवयीन) कठोर संदेश पोहोचवण्यासाठी आवश्यक होता, असेही त्यांनी सांगितले.महिला आयोगाकडून निकालाचे स्वागत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, या निकालाने बलात्कार करणाऱ्यांमध्ये कठोर संदेश पोहोचेल. न्यायाला उशीर झाला, तरी तो नाकारला गेलेला नाही. निर्भयावर बलात्कार करणारे आता फासावर जातील, असे टिष्ट्वट स्वाती जयहिंद यांनी केले आहे.निकाल लागण्यास विलंब झाला असला, तरी आमच्या मुलीला न्याय मिळाला आहे. केवळ माझ्या मुलीलाच नाही, तर संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे. - निर्भयाची आईचारही दोषींना फाशीची शिक्षा गरजेची होती. त्यामुळे समाजात योग्य संदेश पोहोचण्यास मदत होईल. चारही आरोपींना फासावर चढविल्यानंतरच समाधान मिळेल.- निर्भयाचे वडील