शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

11 गोळ्या घालून मोस्ट वॉंटेड वाघिणीचा खात्मा

By admin | Updated: October 20, 2016 22:20 IST

उत्तराखंडच्या रामनगरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून दहशत पसरवणा-या वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. अनेक जणांचा या वाघिणीने जीव घेतला होता तर अनेकांना जबर जखमी

ऑनलाइन लोकमत

देहराडून, दि. 20 - उत्तराखंडच्या रामनगरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून दहशत पसरवणा-या वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. अनेक जणांचा या वाघिणीने जीव घेतला होता तर अनेकांना जबर जखमी केलं होतं. 

या वाघिणीचा वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने खात्मा केला. यासाठी 45 दिवसांपासून मोहीम हाती घेण्यात आली होती.  जवळपास 75 लाख रूपये या मोहिमेत खर्च झाले. तिच्या शोधासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचाही वापर करण्यात आला. 
 
गुरूवारी सकाळी ही वाघिण  दिल्लीपासून 250 किमी दूर रामनगरमध्ये दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली त्यानंतर वाघिणीला घेरण्यात आलं. वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक शिका-यांनी वाघिण दिसताच 11 गोळ्यांच्या फैरी झाडून वाघिणीला मारलं. 
या वाघिणीच्या दहशतीने लहान मुलं शाळेत जाण्यासही घाबरत होती. वनविभागाने या वाघिणीला नरभक्षक घोषीत केलं होतं. वाघिणीच्या मृत्यूनंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वाघिणीला मारण्यासाठी आतापर्यंत चालवण्यात आलेलं हे सर्वात मोठं आणि खर्चिक ऑपरेशन होतं असं सांगितलं जात आहे.