शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

आॅक्सिजनअभावी मुलांचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून हत्याकांड आहे - सत्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:18 IST

गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आॅक्सिजनअभावी मुलांचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून, हत्याकांड आहे अशा शब्दांत नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

लखनौ : गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आॅक्सिजनअभावी मुलांचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून, हत्याकांड आहे अशा शब्दांत नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.कैलाश सत्यार्थी यांनी ७० वर्षांचे हेच स्वातंत्र्य आमच्या मुलांसाठी आहे काय? असा सवाल ट्विटद्वारे केला आहे. ते म्हणाले, भ्रष्ट आरोग्य व्यवस्थेला सुधारण्यासाठी हस्तक्षेप गरजेचा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आॅक्सिन तुटवड्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले आहे.आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी ९ आॅगस्टला हॉस्पिटलचा दौरा केला होता. पण, त्यांना समस्या सांगण्यात आल्या नाहीत. आम्ही हॉस्पिटलला जाऊन परिस्थिती पाहणार आहोत.मेंदूला सूज : आॅक्सिजनच्या कमतरतेने मेंदूला सूज येते आणि त्यात मृत्यू ओढावू शकतो. मुलांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, डॉक्टर योग्य उपचार करत नव्हते. उपचारासाठी आवश्यक औषधीही येथे नव्हती. स्थानिक लोकांनी सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये मोफत औषधे मिळत नाहीत. आवश्यक आरोग्य सुविधा नाहीत.