शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दहा घुसखोरांचा सीमेवरच खात्मा

By admin | Updated: September 21, 2016 06:14 IST

संतप्त भावना देशभरातून व्यक्त होत असतानाच, काश्मीर खोऱ्यात आणखी दहशतवादी पेरण्याचे पाकिस्तानचे दोन प्रयत्न भारतीय लष्कराने मंगळवारी हाणून पाडले

श्रीनगर/ नवी दिल्ली : उरी येथील दहशतवादी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या १८ बहाद्दर जवानांच्या रक्ताचा बदला घेण्याची संतप्त भावना देशभरातून व्यक्त होत असतानाच, काश्मीर खोऱ्यात आणखी दहशतवादी पेरण्याचे पाकिस्तानचे दोन प्रयत्न भारतीय लष्कराने मंगळवारी हाणून पाडले आणि तसे करताना १० घुसखोरांचा सीमेवरच खात्मा केला. कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाला. घुसखोरांना घुसता यावे, यासाठी पाक सैनिकांनी सीमेपलीकडून केलेल्या गोळीबारासही लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी व नोगाम सेक्टरमध्ये घुसू पाहणाऱ्या १५ घुसखोरांना लष्कराने रोखले. या दोन्ही ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये १० घुसखोर ठार झाले. पळून गेलेल्या आणखी घुसखोरांचा पाठलाग करून परिसरातील जंगलात शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. श्रीनगरमधील लष्कराच्या प्रवक्त्याने घुसखोरीचे दोन मोठे प्रयत्न हाणून पाडल्याचे सांगितले. मात्र किती घुसखोर मारले गेले याचा आकडा कारवाई अद्याप कारवाई सुरू असल्याने दिला नाही. नौगाम येथील चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. दिल्लीत मात्र लष्कराच्या प्रवक्त्याने ठार झालेल्या घुसखोरांचा १० आकडा दिला; मात्र त्यांचे मृतदेह संध्याकाळपर्यंत जंगलातून आणले गेले नव्हते, असे सांगितले. (वृत्तसंस्था)>त्वरित कारवाई करून घुसखोरी हाणून पाडलीमंगळवारी हाणून पाडलेले घुसखोरीचे प्रयत्न उरीपासून काही अंतरावरच झाले. उरीच्या हल्लेखोरांना चोख उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही मोदी यांनी दिल्यानंतर लष्करानेही मुठी आवळलेल्या होत्याच.सकाळी लच्छीपुरा आणि बोनियार या प्रत्यक्ष सीमारेषेवरील गावांमध्ये सीमेपलीकडच्या पाकिस्तानी चौक्यांमधून गोळीबार सुरू झाल्यावर आधीच सज्ज असलेले लष्कर अधिक सतर्क झाले. घुसखोरीच्या नव्या प्रयत्नांकडून लक्ष विचलित करण्याची ही खेळी आहे हे ओळखून शस्त्रसंधीच्या या उल्लंघनाचा मुकाबला करीत असतानाच लष्कर परिसरावर लक्ष ठेवून होते. दोन ठिकाणी घुसखोरी होत असल्याचे दिसल्यावर त्वरित कारवाई करून ती हाणून पाडली गेली. सीमेपलीकडून केल्या गेलेल्या गोळीबारात गावांमध्ये कोणताही जीवित-वित्तहानी झाली नाही.या वर्षात पाकिस्तानने सीमेपलीकडून काश्मिरात पाठविलेल्या आणि लष्कराने यमसदनास पाठविलेल्या घुसखोर अतिरेक्यांची संख्या १२३वर पोहोचली आहे.>चार शहिदांना अश्रुपूर्ण निरोपकाश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे संदीप ठोक, साताऱ्याचे चंद्रकांत गलंडे, अमरावतीचे विकास उईके, यवतमाळचे विकास कुळमेथे या जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.