शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागरी वाहतूक प्रकल्पाला गतिरोध

By admin | Updated: July 20, 2015 01:27 IST

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा-दोन या ७ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीत २ हजार कोटी रुपयांचा निधी वांद्रे येथील भूखंड भाडेपट्ट्याने देऊन येणार आहे.

संदीप प्रधान , नवी दिल्लीमुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा-दोन या ७ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीत २ हजार कोटी रुपयांचा निधी वांद्रे येथील भूखंड भाडेपट्ट्याने देऊन येणार आहे. मात्र दोन वेळा या भूखंडाकरिता निविदा मागवून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने आता ही रक्कम कशी उभी करायची, असे प्रश्नचिन्ह मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनसमोर उभे राहिले आहेत.मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा-दोनकरिता वांद्रे येथील ४५ हजार चौरस मीटर भूखंड भाडेपट्ट्याने देऊन २ हजार ३३३ कोटी रुपये उभे करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च ५३०० कोटी रुपये होता. मात्र वांद्रे येथील भूखंडाबाबत कुठलाही निर्णय होत नसल्याने प्र्रकल्पाचा खर्च ७ हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. वांद्रे येथील भूखंडाचा वाद दीर्घकाळ न्यायालयात होता. सुमारे १०० वर्षांपूर्वीची कागदपत्रे रेल्वेकडे उपलब्ध असल्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन बॉम्बे-बडोदा अँड सेंट्रल रेल्वेला ४ लाख ७४ हजार९६२ रुपये नऊ पैसे व पंधरा आणे किमतीला ही जमीन दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी या जमिनीचा ताबा रेल्वेकडे आला.रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीस संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले, की या भूखंडाकरिता दोन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या. ४५ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर भूखंड देण्याची तरतूद होती. मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. आपण या पदावर येण्यापूर्वी निविदा मागवण्यात आल्या होत्या. भाडेपट्ट्याच्या कालावधीमुळे प्रतिसाद मिळत नाही किंवा कसे ते तपासून पाहण्यात येईल. भविष्यात चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.रेल्वे विकास कॉर्पोरेशनला जरी प्रतिसादाची अपेक्षा असली तरी सध्याच्या स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रातील परिस्थितीचा विचार करता एमयूटीपी टप्पा-दोन या प्रकल्पाकरिता वांद्रे येथील भूखंडाच्या व्यवहारावर अवलंबून राहणे याचा अर्थ प्रकल्प अनिश्चितेच्या छायेत ठेवण्यासारखे होईल, असे राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मत आहे.