शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

स्मशानभूमी सोसतेय मरणयातना

By admin | Updated: September 15, 2015 00:18 IST

नव्या वस्तीतील वरूडा व दलित, कुणबी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. स्मशानभूमी आहे की जंगल, असे दृश्य याठिकाणचे झाले आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : प्रकाश व्यवस्था, सुरक्षा कुंपणाचा अभाव, अस्वच्छतेचा कहरबडनेरा : नव्या वस्तीतील वरूडा व दलित, कुणबी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. स्मशानभूमी आहे की जंगल, असे दृश्य याठिकाणचे झाले आहे. महानगरपालिका प्रशासन व संबंधित नगरसेवकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. नव्या वस्तीच्या राजेश्वर युनियन हायस्कूलजवळच वरूडा व दलित, कुणबी स्मशानभूमी आहे. या दोन्ही स्मशानभूमी लागूनच असून रस्त्यालगत वरूडा स्मशानभूमी, तर त्याच्या मागच्या बाजूला दलित व कुणबी या नावाने स्मशानभूमी आहे. या दोन्ही स्मशानभूमी प्रभाग क्रमांक ४२ मध्ये मोडतात. समोरच्या भागातील स्मशानभूमीची एक एकर जागा आहे. या स्मशानभूमीच्या ठिकाणी अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचा निधी मागील दीड वर्षांपूर्वी वापरण्यात आलेला आहे, असे असतानादेखील या स्मशानभूमींची दयनीय अवस्था झाली आहे. वरूडा स्मशानभूमीला अर्धवट संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. यामुळे या स्मशानभूमीच्या सुरक्षेचा विषय समोर आला आहे. ज्या भागात निवारा, शेड व अंतिम संस्काराचे शेड आहे. त्याच्या अवतीभोवती झुडुपं वाढली आहेत. या स्मशानभूमीत लोक शौचाला बसतात. पाण्याची हापशी एका कोपऱ्यात बसविण्यात आली आहे. पथदिवे अनेकदा बंदच असतात. रात्री-अपरात्री अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीदेखील वाढत आहे. स्मशानभूमीच्या स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे. शहरालगतच्या बऱ्याच स्मशानभूमीला बगिचासमान रुप आले आहे. वस्तीची लोकसंख्या मोठी आहे. या दोन्ही स्मशानभूमीचा वापर केला जातो आहे. प्रभाग क्रमांक ४२ चे नगरसेवक कांचन ग्रेसपुंजे व चंदुमल बिल्दानी यांनी स्मशानभूमीच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दलित, कुणबी स्मशानभूमी वनविभागाच्या जागेतवरूडा स्मशानभूमिच्या मागील बाजूला असलेली दलित व कुणबी स्मशानभूमी ही वनविभागाच्या जागेत असल्याची माहिती आहे. ११ हेक्टर ४७ गुंठे जागा असणाऱ्या वनविभागाच्या जागेतील काही भाग स्मशानभूमीसाठी द्यावा, असा जुना आदेश आहे. मात्र वनविभागाकडून त्याची पूर्तता होत नसल्यामुळे या स्मशानभूमिची दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष पुरविणे गरजचे आहे. वरूडा स्मशानभूमी कोणती व दलित, कुणबी स्मशानभूमी कोणती हे अद्यापही बडनेरावासीयांना प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे कळलेले नाही. लोकप्रतिनिधीने विकासासाठी निधी द्यावास्मशानभूमिचा कायापालट करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. वरूडा स्मशानभूमिचा पूर्णत: विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधीने निधी द्यावा, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. त्याचप्रमाणे वनविभागाच्या जागेत असणाऱ्या दलित व कुणबी समाजाच्या स्मशानभूमिला वनविभागाकडून मोकळे करण्यासाठी प्रयत्न करावे.