शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

'गोध्राची पार्श्वभूमी असणाऱ्या मोदींच्या काळात संविधान धोक्यात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:50 IST

इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला.

मुंबई : इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा इशारा आहे. गोध्रा हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली नाही, उलट त्यानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या, दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाली, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते आज देशाच्या पंतप्रधानपदी आहेत आणि संविधान धोक्यात आहे. हे वेगळे सांगायला नको, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान वाचवा, देश वाचवा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजन केले होते. पवार यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यप्रणालीवरही जोरदार टीका केली. गोळवलकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत ‘बेंचेस आॅफ थॉट’ या पुस्तकातून टीका केली होती. अशांच्या विचारांवर चालणारा भाजपा आहे. ते संविधानाविषयी करत असलेली वक्तव्ये धादांत असत्य आहेत, असेही पवार यांनी सांगितले.मध्यंतरी भाजपाचे मंत्री हेगडे यांनी संविधानाविरोधात वक्तव्य केले. त्यावर ते त्यांचे वैयक्तिक मत होते, असे सांगण्यात आले. परंतु त्यांनी एकप्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांचे विचार स्पष्ट केले होते. गोळवलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही शब्दांबाबत पवार यांनी शंका उपस्थित केली. राज्य घटना इतर देशांतून उचलून तयार केली आहे. ती परदेशी विचारधारेवर आधारीत आहे. त्यामुळे ती आपली म्हणण्याचे कारण नाही, असे संबंधित पुस्तकात म्हटले आहे. त्याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्य घटना मानत नाहीत, असे पवार म्हणाले. दलित, अल्पसंख्याक, आदिवासींवर अन्याय झाला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना संरक्षणही दिले पाहिजे, असे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.खा. सुप्रीया सुळे, फौजिया खान, खा. माजीद मेमन यांनीही मार्गदर्शन केले. माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे, खा. वंदना चव्हाण, आ. विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, डॉ. भारती पवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. महिला आरक्षण, संविधान बचाव, महिला अत्याचार विधेयक ठराव उषाताई दराडे, सुरेखा ठाकरे, डॉ. आशा मिरगे यांनी मांडले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार