शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

‘डेंग्यू’ रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट देणे धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 06:34 IST

डेंग्यूच्या रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट (रक्तबिंबाणू) चढविणे धोक्याचे असून, त्यामुळे रुग्णात सेप्सीससारखी गुंतागुंत संभवते

नवी दिल्ली : डेंग्यूच्या रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट (रक्तबिंबाणू) चढविणे धोक्याचे असून, त्यामुळे रुग्णात सेप्सीससारखी गुंतागुंत संभवते, असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे. संसर्गाला प्रतिकार करताना शरीराकडून स्वत:च्याच पेशी आणि अवयवांना इजा पोहोचविली जाण्याच्या आजाराला ‘सेप्सीस’ असे म्हणतात. हा आजार प्राणघातक आहे. दिल्लीत या विषाणूजन्य आजाराने १९ जणांचा बळी घेतला. रुग्णांची संख्या १,३०० वर पोहोचली आहे. डेंग्यूच्या रुग्णांत रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण घसरते आणि जर त्याची भरपाई झाली नाही, तर रुग्णाच्या जीवाला धोका संभवू शकतो. मात्र, प्लेटलेट कमी झाल्यानंतर सरधोपटपणे प्लेटलेट चढविणे हा त्यावर उपाय नाही किंवा तो एकमेव पर्यायही नाही. मुळात डेंग्यूच्या बहुतांश रुग्णांना प्लेटलेट चढविण्याची गरजच नसते. याबाबत लोकांत जागृती घडवून आणण्याची गरज आहे, असे हृदयरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) भावी अध्यक्ष डॉ. डी.के. अग्रवाल यांनी सांगितले. हार्ट केअर फाऊंडेशन आॅफ इंडिया आणि आयएमएने प्लेटलेट चढविण्याच्या विषयावर आज संयुक्तपणे वेबकास्ट उपक्रम घेतला. प्लेटलेट हा डेंग्यूने प्रभावित होणाऱ्या रक्तघटकांतील प्रमुख घटक आहे. प्लेटलेटचे रक्तातील सामान्य प्रमाण १.५ ते ४.५ लाख एवढे असते. आवश्यकता नसताना प्लेटलेट दिल्यास अधिक इजा होऊन रुग्णांत सेप्सीस तसेच रक्त संक्रमणाशी संबंधित इतर गुंतागुंत संभवते, असे मिशन जन जागृती ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. एन.के. भाटिया यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>संकेत समजल्यास डेंग्यूचे सर्व मृत्यू टाळता येऊ शकतातडेंग्यू हॅमरहगिक फीव्हरच्या रुग्णांत प्लेटलेटचे प्रमाण २० हजार किंवा त्याहून खाली घसरल्यास रक्तस्राव होऊ शकतो. बहुतांश डेंग्यू रुग्णांना ही वेळच येत नाही, असे अग्रवाल म्हणाले. डेंग्यू रुग्णांत गुंतागुंत निर्माण होण्याचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. लोकांना धोक्याचे संकेत समजल्यास डेंग्यूचे सर्व मृत्यू टाळता येऊ शकतात. सर्व डेंग्यू रुग्णांना प्लेटलेट चढविण्याची आवश्यकता असते; यात तथ्य नाही. यंत्राद्वारे मिळविलेली प्लेटलेटस्ची संख्या विश्वसनीय नसून त्यात ४० हजारांपर्यंतची तफावत आढळते, असा दावाही त्यांनी केला. डेंग्यूने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांत नव्याने तयार झालेल्या प्लेटलेटस्चे प्रमाण ठराविक पातळीएवढे किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज नसते, असे अलीकडेच झालेल्या अभ्यासात आढळले आहे.