शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

टाकाऊ भाज्यातून तयार केले विविध पदार्थ शून्य कचरा नियोजन: कच्छी जैन मंडळाचा उपक्रम

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

सोलापूर : कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे.

सोलापूर : कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत र्शी सर्वोदय कच्छी जैन मंडळाने स्मार्ट वॉर्ड तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी शून्य कचरा नियोजन ही संकल्पना मांडली आहे. स्वयंपाक घरात आणलेल्या भाज्यांचा वापर झाल्यानंतर देठे, साली व इतर भाग काढून कचर्‍यात टाकले जातात. पण भाज्यांचे देठ व सालीपासून अनेक चविष्ठ पदार्थ बनविता येतात. असा प्रयोग कच्छी जैन मंडळाचे चंदुभाई देढीया, उषाबेन शहा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. याचे प्रात्यक्षिक आयुक्त काळम-पाटील यांना दाखविण्यात आले. भोपळ्याच्या सालीपासून चटणी, कलिंगडाचा पांढरा गर व फ्लॉवरचे पान, केळीच्या सालापासून भाजी व थालीपीठ, पालकाच्या देठापासून पेंडपाला, कोथिंबीरच्या देठापासून मसाला, दोडक्याच्या सालीपासून शिरा व चटणी, पिळलेल्या लिंबाच्या सालीचे लोणचे, डाळिंबाची साल वाळवून औषध, बटाट्याच्या सालीची पावडर असे अनेक रुचकर पदार्थ तयार केले.
बाजारातून आणलेल्या भाज्या निवडल्यानंतर टाकलेले देठ व सालीपासून निम्मा ओला कचरा निर्माण होतो. हा कचरा वेळेत उचलला गेला नाही तर कुजून दुर्गंधी सुटते. त्यामुळे कचर्‍याची समस्या निर्माण होते. पण भाज्या नीट करताना देठ व सालीचे नियोजन केले तर भाज्यांचा खर्च वाचेल याशिवाय कचर्‍याची समस्या निर्माण होणार नाही असे उषाबेन शहा यांनी सांगितले. महिला मंडळे, बचत गट, स्वयंसेवी संस्थाद्वारे ही संकल्पना घरोघरी पोहोचवा असे आदेश महापालिका आयुक्त काळम?पाटील यांनी स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक दत्तात्रय चौघुले यांना दिले. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपायुक्त र्शीकांत मायकलवार, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते.