शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धक्कादायक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतिवापरामुळे येऊ शकतं वृद्धत्व !

By admin | Updated: June 27, 2016 07:10 IST

गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माणसाच्या आयुष्यातील महत्त्व गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 27 - गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माणसाच्या आयुष्यातील महत्त्व गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे. अनेकदा मोबाईल, लॅपटॉपच्या आहारी गेलेला माणूस भूक-तहानही विसरतो, अशा घटनाही समोर आल्या आहेत. मात्र या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिप्रमाणात वापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मोबाईल फोन आणि टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असून, वृद्धत्व लवकर येण्याची चिन्हे असतात, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.  
आरोग्यतज्ज्ञांच्या मते,  इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अतिवापरामुळे त्वचा सैल पडणे, जबडा मोठा होणे, चेह-यावर सुरकुत्या पडणे,  मानेवर चरबी वाढणे, चेह-याच्या सौंदर्यावर विपरीत परिमाण होण्याची शक्यता आहे. कॉम्प्युटर, टॅबलेट, स्मार्टफोन सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या समोर तासनतास बसून राहिल्यास डोकं दुखणं, चेह-यावर सुरकुत्या पडणे आणि खांद्यांचं दुखणंही उद्भवत असल्याची माहिती फोर्टिस हॉस्पिटलचे कॉस्मेटिक सर्जन विनोद विज यांनी दिली आहे. 
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) या संस्थेनं काही दिवसांपूर्वीच केलेल्या सर्वेक्षणातून देशातले 371 लाख लोक मोबाईल आणि इंटरनेटचा अधिक प्रमाणात वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातले 40 टक्के वापरकर्ते हे 19-30 वयातील तरुण आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये नकारात्मकता वाढत असून, त्याचा त्वचा आणि मानेच्या हाडांवर विपरीत परिणाम होत असल्याचं सीनियर कॉस्मेटिक सर्जन मोहन थॉमस यांनी म्हटलं आहे.