शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

संजय खोब्रागडेंच्या मृत्यूपूर्व बयानांत तफावत

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

शासनाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : गोंदिया जिल्‘ातील चर्चित हत्याकांड

शासनाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : गोंदिया जिल्ह्यातील चर्चित हत्याकांड

नागपूर : राज्य शासनाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून संजय खोब्रागडे यांच्या चार मृत्यूपूर्व बयानांत तफावत असल्याची माहिती दिली. तसेच, देवकाबाई (खोब्रागडेची पत्नी) व तिचा प्रियकर राजू गडपायले यांनी मिळून खोब्रागडे यांची हत्या केली असा दावा केला.
१६ मे २०१४ रोजी हे हत्याकांड घडले होते. खोब्रागडे गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा येथील रहिवासी होते. हत्याकांडाचा सीबीआयमार्फत तपास व इतर विनंतीसह प्रदीप खोब्रागडे व दुर्गा रंगारी यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. संजय खोब्रागडे त्यांचे वडील होते. या प्रकरणात शासनाने उत्तर दिले आहे. संजय खोब्रागडे यांना जाळण्यात आले होते. ते ९४ टक्के जळाले होते. गोंदिया येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी चारवेळा दिलेल्या मृत्यूपूर्व बयानांत संबंधित आरोपींनी जाळले, आवाजावरून आरोपींना ओळखले, आरोपींना जाळताना पाहिले व आरोपींना जाळून पळताना पाहिले अशी वेगवेगळी माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी पेट्रोल टाकून जाळल्याचे सांगितले असून रासायनिक अहवालात रॉकेलचा निष्कर्ष निघाला आहे. घटनेनंतर राजू गडपायले फरार झाला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. राजू व देवकाबाईचे अनैतिक संबंध होते. त्यांनी मिळून खोब्रागडे यांना जाळले. देवकाबाईनेही गुन्हा कबूल केला असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
खोब्रागडे यांच्या बयानावरून पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून भादंविच्या कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३०७ व ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३, १, १० अन्वये गुन्हा नोंदविला होता. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांच्या अहवालावरून सहाही आरोपींना प्रकरणातून आरोपमुक्त केले आहे. पोलिसांनी राजू व देवकाबाईचा अतोनात छळ करून हत्येचा कबुलीजबाब वदवून घेतला. चुकीचा तपास करून प्रकरण दुसरीकडे वळविले. यात जेएमएफसी न्यायाधीशांची भूमिकाही संशयास्पद आहे. यामुळे पोलिसांचा तपास रद्दबातल करून सीबीआयमार्फत नव्याने तपास करण्यात यावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. शशिभूषण वाहाणे व ॲड. शैलेश नारनवरे तर, शासनातर्फे एपीपी राजेश नायक यांनी बाजू मांडली.