शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डेंजरस इश्क! प्रेमप्रकरणातून जाताहेत दहशतवादापेक्षा सहा पट बळी

By admin | Updated: April 2, 2017 08:14 IST

देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 2 -  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटात एकमेकांवर प्रेमकरणाऱ्या आर्ची आणि परशाचा क्रूरपणे बळी घेण्यात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. आता या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 2001 ते 2015 या 15 वर्षांमध्ये देशात प्रेमप्रकरणांमधून 38 हजार 585 जणांचा बळी घेण्यात आला आहे. सरासरी आकडेवारीनुसार देशात प्रेमप्रकरणातून दररोज 7 हत्या, 14 आत्महत्या आणि 47 अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. 
सातत्याने दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतामध्ये  दरवर्षी शेकडो नागरिक दहशतवादी कारवायांत मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकणातून होणारे मृत्यूचे प्रमाण सहापट अधिक आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाले आहे. या वृतानुसार 2001 ते 2015 या 15 वर्षांच्या काळात प्रेमप्रकरणातून 38 हजार 585 बळी घेण्यात आले आहेत.  तर याच काळात प्रेमप्रकरणातील अपयश आणि यासंदर्भातील अन्य कारणांमुळे 79 हजार 189 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.  मात्र या  15 वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 20 हजार जणांना मरण आले होते. 
आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व राज्यात गेल्या 15 वर्षांत 3 हजार हून अधिक हत्या प्रेमप्रकरणातून झाल्या आहेत. तसेच देशभरात या काळात 2.6 लाख अपहरणाचे गुन्हेही नोंदवले गेले आहेत. यात महिलांचे अपहरण हे मुख्यत्वेकरून विवाहाच्या उद्देशाने करण्यात आल्याचे समोर आले आहे.  तर प्रेमप्रकणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. तेथे 15 वर्षात 15 हजार जणांनी आत्महत्या केल्या आहेत.