शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

डेंजरस इश्क! प्रेमप्रकरणातून जाताहेत दहशतवादापेक्षा सहा पट बळी

By admin | Updated: April 2, 2017 08:14 IST

देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 2 -  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटात एकमेकांवर प्रेमकरणाऱ्या आर्ची आणि परशाचा क्रूरपणे बळी घेण्यात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. आता या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 2001 ते 2015 या 15 वर्षांमध्ये देशात प्रेमप्रकरणांमधून 38 हजार 585 जणांचा बळी घेण्यात आला आहे. सरासरी आकडेवारीनुसार देशात प्रेमप्रकरणातून दररोज 7 हत्या, 14 आत्महत्या आणि 47 अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. 
सातत्याने दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतामध्ये  दरवर्षी शेकडो नागरिक दहशतवादी कारवायांत मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकणातून होणारे मृत्यूचे प्रमाण सहापट अधिक आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाले आहे. या वृतानुसार 2001 ते 2015 या 15 वर्षांच्या काळात प्रेमप्रकरणातून 38 हजार 585 बळी घेण्यात आले आहेत.  तर याच काळात प्रेमप्रकरणातील अपयश आणि यासंदर्भातील अन्य कारणांमुळे 79 हजार 189 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.  मात्र या  15 वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 20 हजार जणांना मरण आले होते. 
आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व राज्यात गेल्या 15 वर्षांत 3 हजार हून अधिक हत्या प्रेमप्रकरणातून झाल्या आहेत. तसेच देशभरात या काळात 2.6 लाख अपहरणाचे गुन्हेही नोंदवले गेले आहेत. यात महिलांचे अपहरण हे मुख्यत्वेकरून विवाहाच्या उद्देशाने करण्यात आल्याचे समोर आले आहे.  तर प्रेमप्रकणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. तेथे 15 वर्षात 15 हजार जणांनी आत्महत्या केल्या आहेत.