शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डेंजरस इश्क! प्रेमप्रकरणातून जाताहेत दहशतवादापेक्षा सहा पट बळी

By admin | Updated: April 2, 2017 08:14 IST

देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 2 -  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटात एकमेकांवर प्रेमकरणाऱ्या आर्ची आणि परशाचा क्रूरपणे बळी घेण्यात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. आता या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 2001 ते 2015 या 15 वर्षांमध्ये देशात प्रेमप्रकरणांमधून 38 हजार 585 जणांचा बळी घेण्यात आला आहे. सरासरी आकडेवारीनुसार देशात प्रेमप्रकरणातून दररोज 7 हत्या, 14 आत्महत्या आणि 47 अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. 
सातत्याने दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतामध्ये  दरवर्षी शेकडो नागरिक दहशतवादी कारवायांत मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकणातून होणारे मृत्यूचे प्रमाण सहापट अधिक आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाले आहे. या वृतानुसार 2001 ते 2015 या 15 वर्षांच्या काळात प्रेमप्रकरणातून 38 हजार 585 बळी घेण्यात आले आहेत.  तर याच काळात प्रेमप्रकरणातील अपयश आणि यासंदर्भातील अन्य कारणांमुळे 79 हजार 189 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.  मात्र या  15 वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 20 हजार जणांना मरण आले होते. 
आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व राज्यात गेल्या 15 वर्षांत 3 हजार हून अधिक हत्या प्रेमप्रकरणातून झाल्या आहेत. तसेच देशभरात या काळात 2.6 लाख अपहरणाचे गुन्हेही नोंदवले गेले आहेत. यात महिलांचे अपहरण हे मुख्यत्वेकरून विवाहाच्या उद्देशाने करण्यात आल्याचे समोर आले आहे.  तर प्रेमप्रकणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. तेथे 15 वर्षात 15 हजार जणांनी आत्महत्या केल्या आहेत.