शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा.. .भारतात कर्करोगामुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 17, 2015 12:56 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण, आरोग्याला अपायकारक आहार अशा विविध कारणांमुळे देशात कर्करोगामुळे मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण, आरोग्याला अपायकारक आहार अशा विविध कारणांमुळे देशात कर्करोगामुळे मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. २०१४ मध्ये कर्करोगामुळे दररोज सुमारे १,३०० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय वैद्यक संशोधक परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालातून समोर आली आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू कर्करोगामुळेच होतात असा दावाही केला जात आहे. 

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१४ या कालावधीत कर्करोगामुळे होणा-या मृत्यूच्या प्रमाणात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशभरातील कर्करुग्णाच्या २८ लाख २० हजार १७९ रुग्णांपैकी ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०१३ मध्ये २९ लाख २४ हजार ३१४ रुग्णांपैकी ४ लाख ७८ १८० रुग्णांचा तर २०१२ मध्ये ३० लाख १६ हजार ६२८ रुग्णांपैकी ४ लाख ६५ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला होता. वृद्धांची वाढती संख्या, आरोग्यास घातक ठरणारी जीवनशैली, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण अशा विविध कारणांमुळे कर्करोगामुळे मृत्यू होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. कर्करोगापाठोपाठ क्षयरोगामुळे मृत्यू होणा-यांचे रुग्ण दुस-या क्रमांकावर आहेत. क्षयरोगामुळे २०१३ मध्ये तब्बल ५७ हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता असे एका अधिका-याने सांगितले.