शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा.. .भारतात कर्करोगामुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 17, 2015 12:56 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण, आरोग्याला अपायकारक आहार अशा विविध कारणांमुळे देशात कर्करोगामुळे मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण, आरोग्याला अपायकारक आहार अशा विविध कारणांमुळे देशात कर्करोगामुळे मृत्यू होणा-यांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. २०१४ मध्ये कर्करोगामुळे दररोज सुमारे १,३०० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय वैद्यक संशोधक परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालातून समोर आली आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू कर्करोगामुळेच होतात असा दावाही केला जात आहे. 

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१४ या कालावधीत कर्करोगामुळे होणा-या मृत्यूच्या प्रमाणात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशभरातील कर्करुग्णाच्या २८ लाख २० हजार १७९ रुग्णांपैकी ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०१३ मध्ये २९ लाख २४ हजार ३१४ रुग्णांपैकी ४ लाख ७८ १८० रुग्णांचा तर २०१२ मध्ये ३० लाख १६ हजार ६२८ रुग्णांपैकी ४ लाख ६५ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला होता. वृद्धांची वाढती संख्या, आरोग्यास घातक ठरणारी जीवनशैली, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे वाढते प्रमाण अशा विविध कारणांमुळे कर्करोगामुळे मृत्यू होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. कर्करोगापाठोपाठ क्षयरोगामुळे मृत्यू होणा-यांचे रुग्ण दुस-या क्रमांकावर आहेत. क्षयरोगामुळे २०१३ मध्ये तब्बल ५७ हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता असे एका अधिका-याने सांगितले.