शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

धरण उशाला; कोरड घशाला !

By admin | Updated: November 4, 2015 00:24 IST

सलिम सय्यद, अहमदपूर : शहरातील पाणीपुरवठा करणार्‍या लिंबोटी धरणात बर्‍यापैकी पाणीसाठा असताानासुद्धा नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात पालिकेच्या नळाला २० ते २२ दिवसाला पाणी येत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अहमदपूर तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. परंतु, शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

सलिम सय्यद, अहमदपूर : शहरातील पाणीपुरवठा करणार्‍या लिंबोटी धरणात बर्‍यापैकी पाणीसाठा असताानासुद्धा नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात पालिकेच्या नळाला २० ते २२ दिवसाला पाणी येत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अहमदपूर तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. परंतु, शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. २० ते २२ दिवसाला एकदा पाणी येत असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांची गैरसोय होत आहे. शहराला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. लिंबोटी धरणात मुबलक पाण्याचा साठा असूनही शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराला कमीत कमी २ ते ४ दिवसाला पाणीपुरवठा करावा, अशी जनतेची मागणी आहे. एकेकाळी अहमदपूर तालुका कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचनाची कामे हाती घेतल्याने संपूर्ण तालुक्याचाच कायापालट झाला आहे. तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे परिसराचा कायापालट झाला आहे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी अहमदपूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. परंतु, नियोजनाअभावी अहमदपूरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.