शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

दलितांनी लग्नामध्ये गौरी - गणेशाची पूजा करु नये, बसप नेत्याचे वादग्रस्त विधान

By admin | Updated: September 22, 2014 13:45 IST

दलितांनी लग्नसमारंभांमध्ये गौरी-गणपतीचे पूजन करु नये असे वादग्रस्त विधान उत्तरप्रदेशमधील बसप नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लखनौ, दि. २२ - दलितांनी लग्नसमारंभांमध्ये गौरी-गणपतीचे पूजन करु नये असे वादग्रस्त विधान उत्तरप्रदेशमधील बसप नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे. मनुवादी व्यवस्थेत दलित व मागासवर्गीयांची दिशाभूल करुन त्यांना शासकापासून पुन्हा गुलाम बनवण्याची ही चाल आहे असे मौर्य यांनी म्हटले आहे.  
उत्तरप्रदेशमधील विरोधी पक्ष नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू धर्माविषयी वादग्रस्त विधान केल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर बसप प्रमुख मायावती यांनी मौर्य यांचे मत वैयक्तिक असल्याचे स्पष्टीकरण दिले. मायावती म्हणाल्या, बहुजन समाज पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी साकारलेल्या संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवते. बसपला दलित, मागासवर्गीय, उच्चवर्णीय, अल्पसंख्यांक या सर्वांना एकत्र घेऊन समान समाज व्यवस्था निर्माण करायची आहे असे स्पष्टीकरणही मायावतींनी दिले आहे.