शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

गुजरात, राजस्थानकडे चक्रीवादळाची कूच! मुंबईला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 10:25 IST

पंतप्रधानांकडून आढावा; १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली : बिपोरजॉय चक्रीवादळाची वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने होत होती; पण आता ते गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. सध्या हे वादळ पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर असून, ते १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान १५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वादळाचा मार्ग बदलल्यानंतर एसडीआरएफच्या टीमने गुजरातच्या किनारी भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र, कच्छसह १० जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबईतही हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या सोमवारी दुपारी १२ वाजताच्या अपडेटनुसार, सकाळी साडेआठ वाजता वादळ गुजरातच्या पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर होते. द्वारका येथून आतापर्यंत सुमारे १३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चक्रीवादळाशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला.

तब्बल १० दिवस छळणार

  • चक्रीवादळाचा प्रभाव १० दिवस टिकू शकतो. अलीकडच्या काळातील हे सर्वाधिक काळ टिकणारे वादळ
  • गुजरातमधील कच्छ, राजकोट, भावनगर, पोरबंदर, गीर-सोमनाथ, द्वारका, जाखौ, जाफ्राबादमध्ये सतर्कतेचा इशारा.
  • वलसाडमध्ये दक्षता म्हणून सागरी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
  • कच्छ जिल्ह्यात कलम १४४ लागू.
  • गुजरातमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुटी. 
  • केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या सभा भाजपकडून १५ जूनपर्यंत रद्द.

पाकिस्तानातही पूर्वतयारी: बिपोरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दक्षिण सिंध प्रांतातील सखल किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळ