शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गुजरात, राजस्थानकडे चक्रीवादळाची कूच! मुंबईला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 10:25 IST

पंतप्रधानांकडून आढावा; १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली : बिपोरजॉय चक्रीवादळाची वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने होत होती; पण आता ते गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. सध्या हे वादळ पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर असून, ते १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान १५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वादळाचा मार्ग बदलल्यानंतर एसडीआरएफच्या टीमने गुजरातच्या किनारी भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र, कच्छसह १० जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबईतही हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या सोमवारी दुपारी १२ वाजताच्या अपडेटनुसार, सकाळी साडेआठ वाजता वादळ गुजरातच्या पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर होते. द्वारका येथून आतापर्यंत सुमारे १३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चक्रीवादळाशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला.

तब्बल १० दिवस छळणार

  • चक्रीवादळाचा प्रभाव १० दिवस टिकू शकतो. अलीकडच्या काळातील हे सर्वाधिक काळ टिकणारे वादळ
  • गुजरातमधील कच्छ, राजकोट, भावनगर, पोरबंदर, गीर-सोमनाथ, द्वारका, जाखौ, जाफ्राबादमध्ये सतर्कतेचा इशारा.
  • वलसाडमध्ये दक्षता म्हणून सागरी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
  • कच्छ जिल्ह्यात कलम १४४ लागू.
  • गुजरातमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुटी. 
  • केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या सभा भाजपकडून १५ जूनपर्यंत रद्द.

पाकिस्तानातही पूर्वतयारी: बिपोरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दक्षिण सिंध प्रांतातील सखल किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळ