शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या चार जिल्ह्यांत संचारबंदी उठविली

By admin | Updated: July 24, 2016 02:31 IST

परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे काश्मीरच्या चार जिल्ह्यांसह श्रीनगर शहराच्या काही भागांतील संचारबंदी शनिवारी उठविण्यात आली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून खोऱ्याच्या सहा

श्रीनगर : परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे काश्मीरच्या चार जिल्ह्यांसह श्रीनगर शहराच्या काही भागांतील संचारबंदी शनिवारी उठविण्यात आली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून खोऱ्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी सुरूच आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह येथे दाखल झाले असून ते विविध पक्ष, संघटनांच्या शिष्टमंडळांना भेटणार आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.बांदीपोरा, बारामुला, बडगाम आणि गांदरबाल जिल्ह्यासह श्रीनगर शहराच्या काही भागात परिस्थिती सुधारल्यामुळे तेथील संचारबंदी उठविण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ज्या भागातील संचारबंदी उठविण्यात आली तेथे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. खोऱ्यातील अनंतनाग, कुलगाम, कुपवाडा, पुलवामा आणि शोपिया जिल्ह्याासह शहरातील आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी अद्यापही लागू आहे. तूर्तास खोऱ्यात शांतता आहे. वरिष्ठ पोलीसअधिकाऱ्यांना हलवलेश्रीनगर : हिजबुल मुजाहिदीनच कमांडर बुऱ्हाण वाणी मारला गेल्यानंतर सर्वाधिक हिंसाचार झालेल्या दक्षिण काश्मीरातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. दक्षिण काश्मीर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक नितीश कुमार यांची बदली करून त्यांच्या जागी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी गुलाम हसन भट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनंतनागचे पोलीस अधिक्षक अब्दुल जब्बार यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ग्रामीण वाहतूकचे पोलीस अधिक्षक झुबैर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)गृहमंत्र्यांनी विश्वासनिर्मितीचे उपाय घोषित करावेत- काँग्रेसनवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह काश्मीर खोऱ्याच्या दौऱ्यादरम्यान विश्वासनिर्मीतीच्या उपायांसह निदर्शकांविरुद्ध आता पेलेट गनचा वापर न करण्याचीही घोषणा करतील, अशी आशा काँग्रेसने व्यक्त केली आहे. काश्मीरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करून काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदींवरही हल्ला केला. काश्मीर मुद्यावर चर्चा सुरू असताना मोदी राज्यसभेत तसेच लोकसभेत नव्हते. त्यावरून त्यांना व त्यांच्या सरकारला काश्मीरी लोकांची अजिबात पर्वा नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आता १६ दिवसानंतर गृहमंत्री काश्मीरला गेले आहेत. जनतेसमोर ते यापुढे काश्मीरात पेलेट गनचा वापर केला जाणार नाही अशी घोषणा करतील, अशी मला खात्री आहे. काश्मीरी लोकांनी केंद्र व राज्य सरकारांवर पुन्हा विश्वास ठेवावा यासाठी गृहमंत्री विश्वासनिर्मीतीचे उपाय घोषित करतील, अशी मला आशा आहे. घुसखोरीचा प्रयत्न उधळला : काश्मीरात लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी चकमक होऊन एक सैनिक शहीद झाला. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना सैनिकांनी रात्री आव्हान दिले. यावेळी गोळीबार झाला व अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले. चकमकीदरम्यान एक सैनिक जखमी झाला होता. उपचारादरम्यान नंतर त्याचे निधन झाले. उच्च न्यायालय सुरूचजम्मू : हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय बंद होते या वृत्ताचे न्यायालयाच्या निबंधकांनी खंडन केले आहे. उच्च न्यायालयाची दोन्ही पीठे आणि विशेष करून काश्मीर पीठ पुर्णपणे कार्यरत होते, असे निबंधक एम. के. हंजूरा यांनी सांगितले. अशांततेमुळे न्यायालय बंद असल्याचे वृत्त निखालस खोटे आहे. काश्मीरात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वकिलांनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बंद असल्यामुळे येथे यावे लागल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.