शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

देशाची आयटी राजधानी बंगळुरुमध्ये संचारबंदी

By admin | Updated: September 13, 2016 13:00 IST

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १२ - कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे. देशातील आयटी उद्योगाची राजधानी अशी ओळख असलेल्या बंगळुरुच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
 
सोमवारी रात्री १०.३० नंतर बंगळुरुमध्ये कुठेही हिंसाचार झालेला नाही अशी माहिती बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांनी दिली. बंगळुरुच्या राजगोपालनगरमध्ये पोलिसांना निदर्शकांवर गोळीबार करावा लागला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मालमत्तेची नासधूर, तोडफोड प्रकरणी आतापर्यंत ३०० जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
पोलिसांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बंगळुरुमध्ये अनेक ठिकाणी तामिळनाडू रजिस्ट्रेशनची वाहने पेटवून देण्यात आली. दुकाने, बसेस जाळण्यात आल्या. 
 
कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्य सरकारने संपूर्ण बंगळुरुमध्ये १५ हजार पोलिस तैनात केले आहेत. यामध्ये दंगलनियंत्रण पथकाचाही समावेश आहे. ईदची सुट्टी असल्याने रस्ते ओस पडले असून, शाळा महाविद्यालये आणि कार्यालये बंद आहेत.