शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

निष्काळजीपणाचा कळस: आता फरुखाबादमध्ये ४९ बालकांचा मृत्यू, आॅक्सिजनचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:16 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमधील बाबा राघवदास इस्पितळातील १३00 बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच,

फरुखाबाद (उ. प्र.) : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमधील बाबा राघवदास इस्पितळातील १३00 बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच, उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्हा रुग्णालयातही गेल्या महिनाभरात आॅक्सिजनच्या अभावी ४९ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीका सुरू झाली असून, भाजपाचे नेतेही अस्वस्थ झाले आहेत.फरुखाबादमधील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात हा प्रकार घडल्याचे रविवारी उघडीस आले. ही बालके २१ जुलै ते २0 आॅगस्ट या काळात मरण पावली. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या संबंधीच्या बातम्या प्रसारित केल्यानंतर, मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखलघेऊन जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांना चौकशी करण्याचे निर्देशदिले. रवींद्र कुमार व नगर दंडाधिकारी जयेंद्र कुमार जैन यांनी चौकशी करून, सर्व बालकांचे मृत्यू आॅक्सिजनच्या अभावी आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.त्यांच्या अहवालानंतर जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व मुख्य वैद्यकीय अधीक्षकांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. रुग्णालयाच्या प्रशासनाने मात्र, बालकांचा मृत्यू आॅक्सिजनअभावी व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा इन्कार केला आहे. ही सारी बालके कमी वजनाची आणि आजारी होती, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.राज्य सरकारने जिल्हाधिकारी, तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी व मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत.गोरखपूर येथील प्रकरण उघड झाल्यानंतर, सुरुवातीस सरकारने आॅक्सिजन तुटवड्याचा इन्कार करून ते मृत्यू अस्वच्छतेमुळे होणाºया मेंदूज्वराने झाल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर मृत्यूंची संख्या वाढत जाऊन ती काही शेच्या घरात गेल्यावर, सरकारने निष्काळजीपणाची कबुली देत इस्पितळाच्या डॉक्टरांना अटक केली. (वृत्तसंस्था)काँग्रेसची टीका-योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात उत्तर प्रदेश ‘रोगी प्रदेश’झाला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आधी गोरखपूरच्या बाबा राघवदास इस्पितळात चार दिवसांत ७0 बालके मरण पावली. नंतर महिनाभरात मरणाºया बालकांची संख्या १३00 वर गेल्याचे उघडकीस आले. आता फरुखाबादमध्ये एका महिन्यात ४९ बालके मरण पावली आहे. यावरून योगी आदित्यनाथ सरकार कसे निष्काळजी आहे, हेच समोर येते, अशी टीका काँग्रेसने केली.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ