शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कार उत्पादक कंपन्यांना अडीच हजार कोटींचा दंड

By admin | Updated: August 26, 2014 11:43 IST

निकोप स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन करणा-या १४ कार उत्पादक कंपन्याना भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने तब्बल अडीच हजार कोटींचा दंड ठोठावला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - निकोप स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन करणा-या कंपन्यांवर भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयोगाने भारतातील १४ कार उत्पादक कंपन्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझूकी या कंपन्यांचा समावेश आहे.

भारतातील कार उत्पादक कंपन्या बाजारपेठेत निकोप स्पर्धा करत नाही अशी तक्रार भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाकडे (कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया - सीसीआय) आली होती. या तक्रारींची दखल घेत आयोगाने सखोल चौकशीअंती २१५ पानी निर्णय दिला आहे. विशिष्ट ब्रँडची गाडी घेतल्यावर ग्राहकाला गाडीमध्ये त्याच ब्रँडचे स्पेअरपार्ट वापरावे लागत होते. तसेच गाडीची सर्व्हिसिंगही त्याच कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये करावी लागते. या सर्व्हिसिंगमध्ये ग्राहकाकडून हजारो रुपये उकळले जातात. ग्राहकाने गाडीध्ये स्थानिक किंवा विदेशी उत्पादकांचे स्पेअर पार्टचा गाडीत वापर केल्यास तसेच अन्य सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंग केल्यास त्या ग्राहकाला वॉरंटीचा फायदा दिला जात नाही. त्यामुळे बाजारपेठेत निकोप स्पर्धा होत नाही असा निष्कर्ष आयोगाने काढला आहे.  
प्रतिस्पर्धी आयोगातील कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीसीआयने टाटा मोटर्सला १, ३४६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्याखालोखाल मारुती सुझूकी (४७१ कोटी), महिंद्रा अँड महिंद्रा (२९२ कोटी), जनरल मोटर्स (८५ कोटी) आणि होंडा कार (७६ कोटी) यांचा क्रमांक लागतो. फियाट, बीएमडब्ल्यू, फोर्ड आणि अन्य आठ कंपन्यांनाही या दंड आकारण्यात आला आहे. सीसीआयने ऐवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ असून या निर्णयाला कंपन्यांकडून कोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.