शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती बिकट सखल भागात नुकसान : भिज पावसाने ओलावा एक मीटरपर्यंत

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्‍या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल.

जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्‍या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल.

३ जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. जवळपास सहा दिवस पिकांची मशागत करण्यासह खते देणे, तण नियंत्रण अशा कामांमध्ये शेतकरी व्यस्त होते. त्यात शनिवारी रात्रीपासून सततचा भिज पाऊस सुरू झाला. अनेक भागातील पिकांसाठी म्हणजेच पाण्याचा निचरा होणार्‍या, उताराच्या जमिनीवरी पिकांना या पावसाचा लाभ होत आहे. परंतु काळ्या कसदार, पाणी तुंबणार्‍या जमिनीत पिके पिवळी पडत आहेत.

तापी काठावरील भागामध्ये ही समस्या अधिक आहे. परंतु इतरत्र मात्र पिके तरारत आहेत. जिल्ह्यात पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित पेरण्या सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने थांबवाव्या लागल्या आहेत.
केळी, ऊस, मका, सोयाबीनला लाभ
सध्याचा भिज पाऊस केळी, ऊस, सोयाबीन, मका या पिकांना लाभदायी आहे. केळीमध्ये भर पावसात खते देण्याचे काम काही भागात हाती घेण्यात आल्याचे दिसून आले.

सखल भागात समस्या
यातच शेतांमधील सखल भागात मागील काळा तुंबलेले पाणी अद्यापपर्यंत जिरले नव्हते. अशा शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या सखल भागात पाणी पुन्हा साचू लागले आहे.

कपाशी, सोयाबीन, कडधान्य लागवडीची मुदत संपली
आतापर्यंत जिल्हाभरात ८२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा आठ लाख ४२ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होईल, असे उद्दीष्ट होते. अजून जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व्हायची राहीली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी वाफसा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु आता कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके लागवड करण्याची किंवा पेरणीची मुदत संपली आहे. तूर, बाजरी ही पिके पेरावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

नुकसान नाही- कृषि विभाग
हा भिज पाऊस पेरणी झालेल्या पिकांसाठी लाभदायी आहे. फक्त तण नियंत्रण व आंतरमशागतीची कामे खोळंबतील. परंतु पिके खराब होतील, अशी स्थिती नाही. कुठेही नुकसानाची माहिती आलेली नाही. काळ्या जमिनीमध्येही भिज पावसाने नुकसान होत नाही, असा दावा केला.