शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती बिकट सखल भागात नुकसान : भिज पावसाने ओलावा एक मीटरपर्यंत

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्‍या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल.

जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्‍या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल.

३ जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. जवळपास सहा दिवस पिकांची मशागत करण्यासह खते देणे, तण नियंत्रण अशा कामांमध्ये शेतकरी व्यस्त होते. त्यात शनिवारी रात्रीपासून सततचा भिज पाऊस सुरू झाला. अनेक भागातील पिकांसाठी म्हणजेच पाण्याचा निचरा होणार्‍या, उताराच्या जमिनीवरी पिकांना या पावसाचा लाभ होत आहे. परंतु काळ्या कसदार, पाणी तुंबणार्‍या जमिनीत पिके पिवळी पडत आहेत.

तापी काठावरील भागामध्ये ही समस्या अधिक आहे. परंतु इतरत्र मात्र पिके तरारत आहेत. जिल्ह्यात पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित पेरण्या सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने थांबवाव्या लागल्या आहेत.
केळी, ऊस, मका, सोयाबीनला लाभ
सध्याचा भिज पाऊस केळी, ऊस, सोयाबीन, मका या पिकांना लाभदायी आहे. केळीमध्ये भर पावसात खते देण्याचे काम काही भागात हाती घेण्यात आल्याचे दिसून आले.

सखल भागात समस्या
यातच शेतांमधील सखल भागात मागील काळा तुंबलेले पाणी अद्यापपर्यंत जिरले नव्हते. अशा शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या सखल भागात पाणी पुन्हा साचू लागले आहे.

कपाशी, सोयाबीन, कडधान्य लागवडीची मुदत संपली
आतापर्यंत जिल्हाभरात ८२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा आठ लाख ४२ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होईल, असे उद्दीष्ट होते. अजून जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व्हायची राहीली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी वाफसा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु आता कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके लागवड करण्याची किंवा पेरणीची मुदत संपली आहे. तूर, बाजरी ही पिके पेरावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

नुकसान नाही- कृषि विभाग
हा भिज पाऊस पेरणी झालेल्या पिकांसाठी लाभदायी आहे. फक्त तण नियंत्रण व आंतरमशागतीची कामे खोळंबतील. परंतु पिके खराब होतील, अशी स्थिती नाही. कुठेही नुकसानाची माहिती आलेली नाही. काळ्या जमिनीमध्येही भिज पावसाने नुकसान होत नाही, असा दावा केला.