शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

'भारत माता की जय' म्हणणा-यांनाच मारहाण - केजरीवालांची टीका

By admin | Updated: April 6, 2016 11:51 IST

काश्मीरमधील श्रीनगर येथे एनआयटी बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमारावरून अरविंद केजरीवालांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ६ - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एनआयटी ( राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील) बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराबद्दल निंदा करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ' एकीकडे देशभरात भारतमाता की जय अशी घोषणा न देणाऱ्यांना लक्ष्य केलं जात असतानाच काश्मीरमध्ये मात्र भारतमाता की जय म्हणणाऱ्यांनाच भाजपा सरकारने लाठीमार केला' असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ' या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीमार निंदनीय असून काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारने हे त्वरित थांबवले पाहिजे' असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. 
 
काय आहे नेमके प्रकरण?
श्रीनगरमधील एनआयटीमध्ये मंगळवारी रात्री पोलिसांनी बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर लाठीमार केला. त्यानंतर कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
गेल्या आठवड्यात ट्वेंटी-20 वर्ल्डकपमध्ये भारत वि. वेस्ट इंडीज दरम्यान रंगलेल्या उपांत्य सामन्याच्या निकालानंतर काश्मिरी व बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांत हाणामारी झाली होती. भारताचा वेस्ट इंडीजकडून पराभव झाल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. मात्र बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. या तणावामुळे एनआयटी काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. या प्रकारांनंतर मंगळवारी पुन्हा एनआयटी सुरु झाले असता विद्यार्थ्यांच्या एका गटाने कॅम्पसबाहेर निदर्शने केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. काही विद्यार्थ्यांनी लाठीमारचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर अपलोड करत, पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे. आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, मात्र पोलिसांनीच हिंस्त्रपणा करत लाठीमार केला, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. 
दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात आल्याचे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी स्पष्ट केले असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असेही नमूद केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून, दोन सदस्यीय पथक श्रीनगरकडे रवाना झाले आहे.