शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

‘कर्णकर्कश चर्चा ठरताहेत तथ्यांपेक्षा वरचढ’

By admin | Updated: December 30, 2015 02:11 IST

वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत

नवी दिल्ली : वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत, असे निरीक्षण माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी नोंदवले.मंगळवारी जेटलींनी ‘भारतातील प्रसारमाध्यमे २०१४-१५’ हा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी भाष्य करताना जेटलींनी उपरोक्त निरीक्षण नोंदवले. अलीकडे खासगी वृत्तवाहिन्यांचा जणू पूर आला आहे. या वृत्तवाहिन्यांवरील ‘कर्णकर्कश’ चर्चा दर्शक पाहतात व ऐकतातही. पण याउपरही दर्शक तथ्यांपासून दूर राहतात. खरे काय, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा त्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. अशास्थितीत खरे काय, याचा निर्णय दर्शक व वाचकांनाच घ्यायचा आहे, असे जेटली म्हणाले. वृत्तवाहिन्यात अनेकदा खळबळजनक बातम्या देतांना दिसतात आणि अशा बातम्या अनेकदा तथ्यांपासून दूर गेलेल्या दिसतात. याऊलट वृत्तपत्रे वा प्रिंट मीडिया स्पष्ट व निष्पक्षपणे तथ्य सादर करू शकतो.बातमीत स्वत:चे विचार न घालता निष्पक्ष बातमी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी प्रिंट मीडियाकडे आहे. जगात वृत्तपत्र उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असताना भारतात वृत्तपत्र उद्योग भरभराटीस येताना दिसतो आहे, हा लोकशाहीसाठी शुभसंकेत असल्याचेही ते म्हणाले.