शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 02:19 IST

सीमा सुरक्षादलाच्या तक्रारीनंतर कारवाई

कोलकाता : सीमा सुरक्षादलाने (बीएसएफ) एका जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध (बीजीबी) पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यात अन्य एक जवान जखमी झाला आहे.

बॉर्डर गार्ड बांगलादेशने गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर फ्लॅग मीटिंगदरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाची गोळी मारून हत्या केली होती. मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव विजय भान सिंह (५१), असे आहे. या गोळीबारात अन्य एक जवान राजवीर यादव जखमी झाला होता.

सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे की, ही घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सकाळी ९ वाजता घडली होती. भारताच्या सुरक्षा दलाने भारतीय मच्छीमारांसंबंधी मुद्यावर चर्चा करण्यासाठी नदी किनारी उभ्या असलेल्या बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या जवानांशी संपर्क केला होता. याचवेळी ही घटना घडली. मुर्शिदाबादचे पोलीस अधीक्षक मुकेश कुमार यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाकडून तक्रार मिळाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या जवानांनी स्वसुरक्षेसाठी गोळी झाडली, असा दावा बांगलादेशच्या बॉर्डर गार्डने केला असला तरी बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला आहे. भारताकडून एकही गोळी चालविण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

द्विपक्षीय संबंधांवर परिणाम नाही

कोलकाता : बॉर्डर गार्डस बांगलादेशने (बीजीबी) बीएसएफच्या एका जवानाला ठार मारल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी म्हटले आहे की, व्दिपक्षीय संबंधांवर या घटनेचा परिणाम होणार नाही.गरज पडल्यास परिस्थिती शांत करण्यासाठी आपण भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करु, तसेच, बांग्लादेशच्या जलक्षेत्रात पकडण्यात आलेल्या मच्छिमारांची नियमानुसार सुटका करण्यात येईल.

दरम्यान, जवानाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना होती आणि महासंचालक स्तरावरील चर्चेत हा प्रश्न सोडवू. अशा प्रकारचे प्रश्न दोन्ही देशातील बैठकीत सोडविले जायला हवेत. दोन देशातील संबंध चांगले असून ते पुढेही राहतील.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBangladeshबांगलादेश