शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

क्रिकेटरसिकांची लागणार ‘कसोटी’

By admin | Updated: January 21, 2016 01:01 IST

गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या ९ फेब्रुवारीला भारत -श्रीलंका हा या स्टेडियमवरील तिसरा टष्ट्वेंटी-२० सामना होत असून

किवळे : गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या ९ फेब्रुवारीला भारत -श्रीलंका हा या स्टेडियमवरील तिसरा टष्ट्वेंटी-२० सामना होत असून, २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान रणजी करंडक अंतिम सामना होत आहे. त्यांनतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, आयपीएल सत्र नऊचे सामने होणार आहेत. किवळे ते गहुंजे या सेवा रस्त्याची दुतर्फा दुरवस्था झाली असल्याने दोन्ही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. ते सामन्याच्या वेळी प्रेक्षकांची कसोटी पाहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अवघ्या २० दिवसांनी येथील स्टेडियमवर टष्ट्वेंटी-२० सामना होणार आहे. नंतर रणजी अंतिम सामना, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना, आयपीएल सामने होणार असल्याने प्रेक्षकांना येताना व रात्री उशिरा किवळे- ते गहुंजे सेवा रस्त्याने जीव मुठीत धरून ये-जा करावी लागणार आहे. देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने सेवा रस्त्यावरील पुलाची व रस्त्याची अर्धवट कामे, कामाचा निकृष्ट दर्जा, वाहतुकीला होणारे रस्त्यातील अडथळे, रस्त्यावरील धोकादायक खड्डे, असुरक्षित बाजूपट्ट्या, विविध ठिकाणी खचलेला रस्ता, जलवाहिनीचे खोदलेले खोल चर, मार्गदर्शक व दिशादर्शक फलकांचा अभाव अशा समस्यांमुळे प्रत्येक सामन्याच्या वेळी हजारो प्रेक्षकांना तीन अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार असल्याचे रस्त्याच्या सद्य:स्थितीवरून दिसत आहे. सर्वच सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना किवळे ते गहुंजे सेवा रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे व दुरवस्थेमुळे अनेक प्रेक्षकांना त्याचा फटका बसला होता. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती . पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाशेजारून किवळे ते गहुंजे स्टेडियमपर्यंत दोन्ही बाजूंना बनविलेल्या सेवा रस्त्याची अर्धवट कामे तीन-चार वर्षांत पूर्ण झालेली नाहीत, अशी तक्रार वाहनचालकांतून होत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आयपीएल सत्र पाच सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आधिपत्याखाली एका खासगी ठेकेदाराची सेवा रस्ता तीन महिन्यांत बांधण्यासाठी नेमणूक केली होती. या कामासाठी सोळा कोटी चाळीस लाख रुपये खर्च प्रस्तावित होता. आयपीएल सत्र पाचच्या सामन्यांसाठी रस्त्याची कामे अक्षरश: घाईघाईत ‘उरकण्यात’ आली असल्याचे बोलले जात होते. सामने संपल्यानंतरही अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामात दर्जा राखण्यात ठेकेदाराला अपयश आले आहे. महत्त्वाची कामे अद्यापही अर्धवट आहेत. काम पूर्ण करण्याची मुदतही कधीच संपली आहे. गहुंजे पुलाखाली बाजूंना रस्ता व्यवस्थित बनविला नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेकदा दुचाकी वाहने घसरत आहेत. किवळे, मामुर्डी व देहूरोड भागातून येणाऱ्या ओढे व नाल्यांवरील पुलाची कामे अर्धवट असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रस्ता बनविताना बाजूपट्ट्या तयार केलेल्या नाहीत. त्या नसल्याने सामन्यांच्या वेळी व नंतरदेखील स्थानिक ग्रामस्थांचे अनेक अपघात झाले होते. सेवा रस्त्याच्या बाजूची झाडे-झुडपे विविध ठिकाणी काढण्यात न आल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. सर्वत्र पथदिवे बसविलेले नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. द्रुतगती महामार्गाच्या गहुंजेतील पुलाखालील वळण रस्त्यावर समोरून अचानक येणाऱ्या वाहनांचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तेथे रिफ्लेकटर, रेडियम पट्ट्या लावणे गरजेचे आहे. द्रुतगतीच्या पुलाशेजारी कॅन्टोन्मेंट बोर्डाची मुख्य जलवाहिनी आडवी येते. रस्त्याला अवघड वळण देण्यात आलेले आहे. पवना जलवाहिनीचे काम बंद पडून चार वर्षे उलटले. ठेकेदाराने जलवाहिनीसाठी खोदलेले चर रस्त्यालगत असल्याने वाहनचालक नवखे असल्यास अंदाज न आल्यास थेट चरात पडण्याची शक्यता आहे. सेवा रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय योजण्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना दुर्लक्ष होत आहे. सामन्याच्या वेळी पुरेसे दिवे लावले जात नाहीत. (वार्ताहर)