शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका शक्यच नाही - विजय गोएल

By admin | Updated: May 29, 2017 13:33 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा..

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 29 - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दोन्ही देशाच्या मीडियामध्ये व्दिपक्षीय मालिकेची चर्चा सुरु झाली आहे. पण भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेट मालिकेची शक्यता फेटाळून लावली आहे. 
 
क्रिकेट आणि दहशतवाद एकचवेळी चालू शकत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. येत्या चार जूनला इंग्लंडमध्ये एजबेस्टॉनवर दोन्ही देशांमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे पदाधिकारी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी दुबईत भेटून दोन्ही देशात क्रिकेट मालिका खेळवण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. मात्र त्याआधीच गोएल यांनी स्पष्ट संदेश दिला आहे.  
 
आयसीसीच्या कार्यक्रमानुसार यावर्षाच्या अखेरीस भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव आहे. पण सध्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारचे वातावरण आहे त्यामुळे अशी मालिका शक्य नाही.  पाकिस्तान बरोबर कुठल्याही मालिकेचा प्रस्ताव देण्याआधी बीसीसीआयने सरकारशी चर्चा करावी, सद्य परिस्थितीत पाकिस्तानबरोबर कुठलीही मालिका शक्य नाही  असे विजय गोएल यांनी स्पष्ट केले.