शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

स्मशानभूमीतील टिनशेड गायब

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

स्मशानभूमीतील टिनशेड गायब

स्मशानभूमीतील टिनशेड गायब
डोंगरगाववासी त्रस्त : दु:खाच्या प्रसंगीही वेदनाच, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सुरेख नखाते ० पचखेडी
मनुष्याचा मृत्यू अटळ असला तरी मात्र मृतदेहावर योग्यरीत्या अंत्यविधीचे सोपस्कार पार पडावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात चक्क छत्री घेऊन मृतावर अंत्यविधी पार पाडावा लागत असल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगावलगतच्या डोंगरगाव येथील स्मशानभूमीचे टिनशेड गायब असल्याने दु:खाच्या प्रसंगीही आप्तांना नाहक वेदनाच सहन कराव्या लागत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
डोंगरगाव येथे जवळपास तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निधीतून स्मशानभूमीतील टिनशेड व ओट्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु अल्पावधीतच टिनशेड कुठे गायब झाले, हे कळायला मार्ग नाही. नागरिकांना अंत्यविधीच्या वेळेस कसेबसे छत्री घेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यातच कधी कधी मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत राहून दुसऱ्या दिवशी परत जाळण्याची वेळ येते. स्मशान भूमीतील टिनशेड उडाल्यामुळे ही स्थिती उद्भवते. मृत शरीराची ही थट्टा नव्हे काय, असा सवाल डोंगरगाववासी करीत आहेत.
स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी साधा हॅण्डपंपही नाही. अंत्यविधीसाठी दाखल झालेल्या नागरिकांना एक कि.मी. अंतरावरील विहिरीतून पाणी आणूनच पुढील सोपस्कार पार पाडावे लागतात, अशी माहिती पोलीसपाटील दाजीबा जुनघरे यांनी दिली. डोंगरगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत डोंगरगाव, डोडमा व नवरगाव या तीन गावांचा समावेश आहे. त्यातही ग्रामपंचायत कार्यालय डोडमा येथे असल्याने डोंगरगावमधील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. जवळपास एक हजार लोकसंख्या असलेल्या डोंगरगावसह परिसरातील अन्य गावातील नागरिक याच स्मशानभूमीचा वापर करतात.
पाणी, रस्ता या मूलभूत समस्यांसह ओट्यांचीही बिकट अवस्था असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. दहनशेडवरील टिनपत्रे पूर्णत: जीर्ण होऊन उडाली. शिवाय परिसरात सर्वत्र कचरा व झुडपे वाढली असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंत्यविधी करायचा कुठे, असा संतप्त सवाल डोंगरगाववासी करीत आहेत.