शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयाची योग्यता कोर्ट ठरवू शकत नाही

By admin | Updated: April 1, 2015 23:52 IST

ओडिशातील तालिबिरा-२ कोळसापट्टा हिंदाल्को कंपनीस देण्याचा निर्णय कोळसामंत्री या नात्याने घेतलेला प्रशासकीय निर्णय होता व

नवी दिल्ली : ओडिशातील तालिबिरा-२ कोळसापट्टा हिंदाल्को कंपनीस देण्याचा निर्णय कोळसामंत्री या नात्याने घेतलेला प्रशासकीय निर्णय होता व असा निर्णय योग्य आहे की, अयोग्य तसेच तो सार्वजनिक हिताचा आहे की, नाही हे ठरविणे न्यायालयाचे काम नाही; असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केले.या खाणवाटपाशी संबंधित खटल्यात आरोपी करून समन्स काढण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केलेल्या विशेष अनुमती याचिकेत वरील प्रतिपादन करून डॉ. सिंग म्हणतात की, एखादा व्यवहार गुन्हा या वर्गात मोडतो की नाही व तसे असेल तर त्या गुन्ह्याची जबाबदारी टाकण्याइतपत कोणाविरुद्ध पुरेसा प्रथमदर्शनी पुरावा आहे का हे ठरविणे एवढेच न्यायालयाचे काम असते.विशेष न्यायालयाने दिलेला तर्क सुप्रस्थापित फौजदारी न्यायतत्वांना पार हरताळ फासणारा आहे, असा युक्तीवाद करताना डॉ. सिंग यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, कोणतीही कृती गुन्हा ठरण्यासाठी ती करताना संबंधित व्यक्तीची गुन्हेगारी मानसिकता असणे हा मुलभूत निकष आहे. संदर्भित निर्णय घेताना डॉ. सिंग यांची अशी गुन्हेगारी मानसिकता होती, अशी पुसटशी शक्यताही तपासी अहवालावरून दिसत नाही. त्यामुळे विशेष न्यायालयाचा निर्णय तद्दन बेकायदा व असमर्थनीय आहे.जो निर्णय सरकारी कामकाजाचा नेहमीचा भाग म्हणून घेतला गेला त्यास न्यायालयाने पश्चातबुद्धीने सार्वजनिक हिताच्या विरुद्ध मानून त्यात गुन्हेगारी हेतू पाहणे हे अकल्पित असल्याचे सांगताना डॉ. सिंग यांची याचिका म्हणते की, आपण जो निर्णय घेत आहोत तो सरळसरळ गुन्हा आहे याची स्पष्ट कल्पना असूनही निर्णय घेतला गेला असेल तरच तो निर्णय घेणाऱ्यावर गुन्ह्याचे बालंट आणता येते. अन्यथा आपण घेत असलेल्या निर्णयात उद्या गुन्हेगारी हेतू पाहिला जाऊन आपल्याला कोर्टात खेटे घालावे लागतील या भीतीने सरकारी पदावरील सक्षम अधिकारी प्राप्त परिस्थितीत त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासही कचरतील.(लोकमत न्यूज नेटवर्क)