शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा देशव्यापी संपाचा इशारा

By admin | Updated: August 29, 2016 02:54 IST

मोदी सरकारशी चर्चा झाल्यानंतरही देशातल्या कामगार संघटना येत्या २ सप्टेंबर रोजी देशव्यापी हरताळ पाळण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली मोदी सरकारशी चर्चा झाल्यानंतरही देशातल्या कामगार संघटना येत्या २ सप्टेंबर रोजी देशव्यापी हरताळ पाळण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. कामगार संघटनांचा निर्धार लक्षात घेता, ऊर्जा व कोळसामंत्री पीयूष गोयल आणि श्रम व रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी श्रम मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी देशव्यापी हरताळावर सखोल चर्चा केली.कामगार संघटनांचा आरोप आहे की, केंद्र सरकारने कामगार संघटनांच्या १२ सूत्री मागण्या मान्य केलेल्या नाहीत. किमान वेतन निश्चित करणे, जीवनाश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण घालणे, कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजना इत्यादी मागण्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद देण्यास केंद्र सरकार विफल ठरले आहे. सरकारचा यथास्थिती अहवाल अजूनही गतवर्षाच्या भूमिकेवरच कायम आहे. केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करीत (भारतीय मजदूर संघ वगळता), सिटू, आयटक, इंटकसारख्या देशातल्या तमाम कामगार संघटनांनी २ सप्टेंबरला देशव्यापी हरताळ पाळण्याचा निर्धार केला आहे.कामगारांच्या १२ सूत्री मागण्यांवर केंद्रीय कामगार संघटनांशी चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी, मोदी सरकारने अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली ५ केंद्रीय मंत्र्यांची एक उच्चस्तरिय समिती नियुक्त केली आहे. पीयूष गोयल व बंडारू दत्तात्रय या समितीचे सदस्य आहेत. मंत्र्यांच्या या समितीने अलीकडेच संघपरिवाराची शाखा असलेल्या भारतीय मजदूर संघाशी स्वतंत्रपणे कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. चर्चेत अंगणवाडी सेवक व सेविकांना प्रॉव्हिडंड फंड व वैद्यकीय चिकि त्सेची सुविधा पुरवण्याबरोबरच, किमान वेतनाच्या मागणीबाबतही मंत्री समितीने तत्त्वत: सहमती दर्शवली. तथापि, सरकारने लवकरात लवकर याबाबत आदेश जारी करावेत, असा आग्रह या वेळी भारतीय मजदूर संघाने धरला होता. भारतीय मजदूर संघाशी सरकारने स्वतंत्रपणे चर्चा केल्याचा आक्षेप नोंदवित, देशातल्या अन्य कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली व सरकारवर टीकेची झोड उठवली.२ सप्टेंबरच्या देशव्यापी हरताळासंबंधी बोलताना सेंट्रल ट्रेड युनियनचे जनरल सेक्रेटरी तपन सेन म्हणाले, हरताळ मागे घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) चे उपाध्यक्ष अशोकसिंग म्हणाले, २ सप्टेंबरच्या देशव्यापी हरताळात सहभागी होण्याचा इंटकने निर्णय घेतला आहे. भारतीय मजदूर संघाने मात्र या हरताळात सहभागी व्हायचे की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. संघाच्या प्रतिनिधींना अपेक्षा आहे की, केंद्र सरकार २ सप्टेंबरपूर्वीच काहीतरी सकारात्मक निर्णय जाहीर करील.