शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

देशव्यापी गोहत्याबंदी हवी

By admin | Updated: April 10, 2017 01:09 IST

‘भारतात गोमातेचे रक्षण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. संपूर्ण भारतात त्यासाठी गोहत्येवर प्रतिबंध

नवी दिल्ली : ‘भारतात गोमातेचे रक्षण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. संपूर्ण भारतात त्यासाठी गोहत्येवर प्रतिबंध घालणारा कायदा सक्तीने अमलात आला पाहिजे. ही जबाबदारी केंद्र्र सरकारची आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी रविवारी दिल्लीत केले. राष्ट्रीय स्तरावर ही मागणी अधोरेखित करण्यासाठी त्यांनी दिवस निवडला महावीर जयंतीचा. ‘अहिंसा परमो धर्म’ चे तत्वज्ञान सांगणाऱ्या जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते.गोहत्या बंदी विषयी रा.स्व. संघाची आस्था व्यक्त करतांना भागवत म्हणाले, भारतात ज्या राज्यांमधे संघाचे समर्पित स्वयंसेवक आहेत, तिथल्या राज्य सरकारांनी गोहत्या बंदीचा कायदा लागू केला मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे अशी संघाची इच्छा आहे. गोहत्या प्रतिबंधाच्या नावाखाली राजस्थानात अलवर येथे गोरक्षकांनी एक गाडी अडवून काही लोकांना जबरदस्त मारहाण केली. त्यात पहलू खान नावाच्या दूधव्यावसायिकाचा व्यक्तिचा मृत्यू ओढवला. इतकेच नव्हे तर आक्रमक गोरक्षकांनी देशाच्या विविध भागात तुफान हाणामाऱ्या चालवलेल्या आहेत. देशभर या घटनांचे पडसाद उमटत आहेत. संसदेत व संसदेबाहेर या विषयावर आक्रोशाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर देशव्यापी गोहत्या बंदीची भागवत यांनी केलेली मागणी लक्षणीय म्हणावी लागेल.अलवर येथील घटनेच्या संदर्भात आक्रमक गोरक्षकांबाबत बोलतांना भागवत म्हणाले, गोहत्या बंदीसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा आम्हाला मंजूर नाही. मूळ अभियान अशा प्रकारांमुळे बाजूलाच रहाते आणि या महत्वाच्या मागणीवर त्याचे दुष्परिणाम ओढवतात. गोमतेच्या रक्षणाचे काम कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)