शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

देशव्यापी गोहत्याबंदी हवी

By admin | Updated: April 10, 2017 01:09 IST

‘भारतात गोमातेचे रक्षण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. संपूर्ण भारतात त्यासाठी गोहत्येवर प्रतिबंध

नवी दिल्ली : ‘भारतात गोमातेचे रक्षण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. संपूर्ण भारतात त्यासाठी गोहत्येवर प्रतिबंध घालणारा कायदा सक्तीने अमलात आला पाहिजे. ही जबाबदारी केंद्र्र सरकारची आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी रविवारी दिल्लीत केले. राष्ट्रीय स्तरावर ही मागणी अधोरेखित करण्यासाठी त्यांनी दिवस निवडला महावीर जयंतीचा. ‘अहिंसा परमो धर्म’ चे तत्वज्ञान सांगणाऱ्या जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते.गोहत्या बंदी विषयी रा.स्व. संघाची आस्था व्यक्त करतांना भागवत म्हणाले, भारतात ज्या राज्यांमधे संघाचे समर्पित स्वयंसेवक आहेत, तिथल्या राज्य सरकारांनी गोहत्या बंदीचा कायदा लागू केला मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे अशी संघाची इच्छा आहे. गोहत्या प्रतिबंधाच्या नावाखाली राजस्थानात अलवर येथे गोरक्षकांनी एक गाडी अडवून काही लोकांना जबरदस्त मारहाण केली. त्यात पहलू खान नावाच्या दूधव्यावसायिकाचा व्यक्तिचा मृत्यू ओढवला. इतकेच नव्हे तर आक्रमक गोरक्षकांनी देशाच्या विविध भागात तुफान हाणामाऱ्या चालवलेल्या आहेत. देशभर या घटनांचे पडसाद उमटत आहेत. संसदेत व संसदेबाहेर या विषयावर आक्रोशाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर देशव्यापी गोहत्या बंदीची भागवत यांनी केलेली मागणी लक्षणीय म्हणावी लागेल.अलवर येथील घटनेच्या संदर्भात आक्रमक गोरक्षकांबाबत बोलतांना भागवत म्हणाले, गोहत्या बंदीसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा आम्हाला मंजूर नाही. मूळ अभियान अशा प्रकारांमुळे बाजूलाच रहाते आणि या महत्वाच्या मागणीवर त्याचे दुष्परिणाम ओढवतात. गोमतेच्या रक्षणाचे काम कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)